शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाठी बंदोबस्त; २१७ पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:13 IST

समस्या सोडविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर तैनात

निखिल म्हात्रेअलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. परतीच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी २९ पर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण २१७ जणांचा बंदोबस्त मुंबई-गोवा महामार्गावर ठेण्यात आला आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शनही घेता आले नाही. मात्र, नागरिकांची सेवा हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद असल्याचे काही पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने, गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास यावेळी प्रवाशांना जाणवला नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेही भरण्यात आल्याने प्रवास सुखकारक झाला आहे.नियुक्त पोलीसपाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर, कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाºया भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत, महत्त्वाच्या स्पॉटवर ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, १३ सह.पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, २१७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीस स्टेशनअंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम : गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने, रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे, वाहतूककोंडी होऊन नये, याकरिता माणगावमधून काढलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व या गणेशभक्तांनी नियमांचे पालन करीत गाडी चालविल्यास प्रवास सुखकर होणार, हे निश्चित अशी प्रतिक्रि या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आर. पी शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव