शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अर्णब गाेस्वामीप्रकरणी ५ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:00 IST

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती

रायगड : अर्णब गोस्वामी यांच्या विराेधात जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आजपासून न्यायालय सुट्टीवर गेल्याने आता ५ डिसेंबर तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आराेपी अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. सुमारे आठ तास या खटल्याची सुनवाणी सुरू हाेती. दाेन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आराेपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. रायगड पाेलिसांना गाेस्वामी यांची पोलीस काेठडी पाहिजे हाेती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले. गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र अलिबागच्या न्यायालयातूनच न्याय मिळावा, असे उच्च न्यायालयाने सांगत गाेस्वामी यांचा अर्ज फेटाळून लावला हाेता. गाेस्वामी यांच्यासह सारडा आणि शेख यांना अलिबाग नगरपालिकेच्या शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले हाेते. 

जिल्हा सत्र न्यायालयातील रायगड पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली हाेती. दिवाळीच्या सुट्टीमुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला हाेता. न्यायालय २३ नाेव्हेंबर राेजी निकाल देण्याची शक्यता हाेती. मात्र आज न्यायालय सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे आता ५ डिसेंबर तारीख दिली आहे.- ॲड. निहा राऊत, आराेपीच्या वकील

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRaigadरायगडCourtन्यायालय