शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याला लवकरच मिळणार मंजुरी

By admin | Updated: June 28, 2017 03:31 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्याने त्यातून ३२ सदस्यांच्या निवडी अद्याप होणे बाकी आहे, असे असताना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीमधील अस्तित्वात असलेले खासदार, आमदार हेच सदस्य जिल्ह्याच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देणार आहेत.रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वर्षाव केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात नियोजन समितीला सुमारे १७० कोटी रुपये वाट्याला आले आहेत, तर आदिवासी उपयोजनांसाठी ५५ कोटी ९५ लाख रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २४ कोटी १९ लाख रुपये, असे एकूण २५० कोटी १४ लाख रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा निधी प्रथमच जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील विकासकामे फास्ट ट्रॅकवर येणार आहेत.जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. पालकमंत्री हे अध्यक्ष असतात, तर जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सदस्य असतात. त्याचप्रमाणे नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता येते. मात्र, त्यासाठी त्यांना समितीवर निवडून जावे लागते. नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे त्यातून नव्याने सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता आले, तर त्यांना त्यांच्या विभागात आवश्यक असणारा विकास करता येऊ शकतो; परंतु अद्याप त्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. वेळेची मर्यादा लक्षात घेता, आता जिल्हा नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची कार्याेत्तर मंजुरी घ्यायची आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि अस्तित्वात असणारे खासदार, आमदार यांना निमंत्रित करून जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यासाठीची बैठक ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार आहे.आमदार, खासदार विकास आराखड्याला मंजुरी देऊन मोकळे होतील; परंतु स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवडणूकच न झाल्याने त्यांची संधी हुकणार आहे. निवडणुका पार पडल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.