शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विकास आराखड्याला लवकरच मिळणार मंजुरी

By admin | Updated: June 28, 2017 03:31 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्याने त्यातून ३२ सदस्यांच्या निवडी अद्याप होणे बाकी आहे, असे असताना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीमधील अस्तित्वात असलेले खासदार, आमदार हेच सदस्य जिल्ह्याच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देणार आहेत.रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वर्षाव केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात नियोजन समितीला सुमारे १७० कोटी रुपये वाट्याला आले आहेत, तर आदिवासी उपयोजनांसाठी ५५ कोटी ९५ लाख रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २४ कोटी १९ लाख रुपये, असे एकूण २५० कोटी १४ लाख रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा निधी प्रथमच जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील विकासकामे फास्ट ट्रॅकवर येणार आहेत.जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. पालकमंत्री हे अध्यक्ष असतात, तर जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सदस्य असतात. त्याचप्रमाणे नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता येते. मात्र, त्यासाठी त्यांना समितीवर निवडून जावे लागते. नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे त्यातून नव्याने सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता आले, तर त्यांना त्यांच्या विभागात आवश्यक असणारा विकास करता येऊ शकतो; परंतु अद्याप त्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. वेळेची मर्यादा लक्षात घेता, आता जिल्हा नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची कार्याेत्तर मंजुरी घ्यायची आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि अस्तित्वात असणारे खासदार, आमदार यांना निमंत्रित करून जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यासाठीची बैठक ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार आहे.आमदार, खासदार विकास आराखड्याला मंजुरी देऊन मोकळे होतील; परंतु स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवडणूकच न झाल्याने त्यांची संधी हुकणार आहे. निवडणुका पार पडल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.