शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विकास आराखड्याला लवकरच मिळणार मंजुरी

By admin | Updated: June 28, 2017 03:31 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे २५० कोटी १४ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्याने त्यातून ३२ सदस्यांच्या निवडी अद्याप होणे बाकी आहे, असे असताना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीमधील अस्तित्वात असलेले खासदार, आमदार हेच सदस्य जिल्ह्याच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देणार आहेत.रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वर्षाव केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात नियोजन समितीला सुमारे १७० कोटी रुपये वाट्याला आले आहेत, तर आदिवासी उपयोजनांसाठी ५५ कोटी ९५ लाख रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २४ कोटी १९ लाख रुपये, असे एकूण २५० कोटी १४ लाख रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा निधी प्रथमच जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील विकासकामे फास्ट ट्रॅकवर येणार आहेत.जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. पालकमंत्री हे अध्यक्ष असतात, तर जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सदस्य असतात. त्याचप्रमाणे नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता येते. मात्र, त्यासाठी त्यांना समितीवर निवडून जावे लागते. नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे त्यातून नव्याने सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करता आले, तर त्यांना त्यांच्या विभागात आवश्यक असणारा विकास करता येऊ शकतो; परंतु अद्याप त्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. वेळेची मर्यादा लक्षात घेता, आता जिल्हा नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची कार्याेत्तर मंजुरी घ्यायची आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि अस्तित्वात असणारे खासदार, आमदार यांना निमंत्रित करून जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यासाठीची बैठक ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार आहे.आमदार, खासदार विकास आराखड्याला मंजुरी देऊन मोकळे होतील; परंतु स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची निवडणूकच न झाल्याने त्यांची संधी हुकणार आहे. निवडणुका पार पडल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.