शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यात आणखी एका कुपोषित बालकाचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 03:00 IST

कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा

रविंद्र साळवे,  मोखाडाया तालुक्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा या दोन वर्षीय बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याच मतदारसंघात कुपोषण बळीच्या एकामागे एक घटना घडत असल्याने सवरा यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असून या कुपोषण बळी कुटुंबाला सांत्वन करायला पालकमंत्र्यांना मात्र वेळ नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि सभापती सारिका निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले मोखाड्यात कुपोषण बळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडत आहेत तरी देखील येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बालरोग तज्ञ पद रिक्त असून लवकरात लवकर ही पदे भरली जावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पुढे कुपोषणामुळे बळी पडल्यास मंत्रालयासमोर किंवा तहसील कार्यालय समोर त्याचे अंत्यविधी केले जातील, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिली असून कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी आदिवासी विभाग आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास कार्यालय यांची सर्वांची आहे यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी अशी प्रतिक्रि या लोकमतशी बोलताना दिली.१९९२-९३ वावर वांगणीत उद्भवलेले कुपोषणाच्या बळींचे सत्र आजतागायत आदीवासींची पाठ सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस ते कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कुपोषणाच्या आकडेवारीत भरच पडली आहे. पालघर जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पिडीत असून ० ते १ वर्षातील ४४१ आणि १ ते ६ वर्षातील १४६ आणि मोखाड्यात १३ अशा एकूण ६०० बालकांचा मृत्यू झाला असून मोखाड्यात ४९३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. कुपोषणाला आटोक्यात आणण्यासाठी आजतागायत अनेक योजना अमलात आणल्या गेल्या परंतु कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कुपोषणामुळे मोखाडा तालुका संवेदनशील असून देखील या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ नाहीत. २०१३ पासून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अमलात आणली तीत स्तनदा माता, गरोदर माता यांना २५ रुपयात आहार देण्याची तरतूद होती. परंतु २५ रुपयात सकस आहार कसा पुरवणार हा प्रश्न निर्माण होऊन मे महिन्यापासून या योजनेचा निधीच न आल्याने ही योजनाच कुपोषित झाली आहे.