शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

मोखाड्यात आणखी एका कुपोषित बालकाचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 03:00 IST

कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा

रविंद्र साळवे,  मोखाडाया तालुक्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा या दोन वर्षीय बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याच मतदारसंघात कुपोषण बळीच्या एकामागे एक घटना घडत असल्याने सवरा यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असून या कुपोषण बळी कुटुंबाला सांत्वन करायला पालकमंत्र्यांना मात्र वेळ नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि सभापती सारिका निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले मोखाड्यात कुपोषण बळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडत आहेत तरी देखील येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बालरोग तज्ञ पद रिक्त असून लवकरात लवकर ही पदे भरली जावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पुढे कुपोषणामुळे बळी पडल्यास मंत्रालयासमोर किंवा तहसील कार्यालय समोर त्याचे अंत्यविधी केले जातील, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिली असून कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी आदिवासी विभाग आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास कार्यालय यांची सर्वांची आहे यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी अशी प्रतिक्रि या लोकमतशी बोलताना दिली.१९९२-९३ वावर वांगणीत उद्भवलेले कुपोषणाच्या बळींचे सत्र आजतागायत आदीवासींची पाठ सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस ते कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कुपोषणाच्या आकडेवारीत भरच पडली आहे. पालघर जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पिडीत असून ० ते १ वर्षातील ४४१ आणि १ ते ६ वर्षातील १४६ आणि मोखाड्यात १३ अशा एकूण ६०० बालकांचा मृत्यू झाला असून मोखाड्यात ४९३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. कुपोषणाला आटोक्यात आणण्यासाठी आजतागायत अनेक योजना अमलात आणल्या गेल्या परंतु कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कुपोषणामुळे मोखाडा तालुका संवेदनशील असून देखील या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ नाहीत. २०१३ पासून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अमलात आणली तीत स्तनदा माता, गरोदर माता यांना २५ रुपयात आहार देण्याची तरतूद होती. परंतु २५ रुपयात सकस आहार कसा पुरवणार हा प्रश्न निर्माण होऊन मे महिन्यापासून या योजनेचा निधीच न आल्याने ही योजनाच कुपोषित झाली आहे.