शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चालविताना मोबाइलचा वापर करणे आले अंगलट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:37 IST

५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई; २६ लाख ४४ हजार दंड वसूल

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वाहन चालविताना सतत मोबाइलवर बोलन वा व्हाॅट्सॲपवर चॅट करण्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून गाडीला आरसा नसल्यास व विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या, पण हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई करून २६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मोटरसायकलला दोन आरसे लावणे बंधनकारक आहे. मात्र आजची स्टाईल म्हणून आरसे न लावता मोटरसायकलस्वार गाडी हाकताना दिसत आहेत. त्यामुळे मागून ओव्हर टेक करणारा दिसून येत नाही. दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमातून लावले जातात; परंतु युवावर्ग गाडी माॅडीफाय करून दोन्ही आरसे काढीत आहेत.

आरसा नाही म्हणून २०० रुपयांचा दंड मोटरसायकलला माॅडीफाय करून तिचा स्पोर्ट्स बाईक म्हणून वापर करणारे गाडीचे दोन्ही आरसे काढून टाकतात. त्यामुळे मोटरसायकलस्वारांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते. अपघात थोपविण्यासाठी मोटरसायकलला आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.

वाहतुकीचे हे नियम बंधनकारक मोटार वाहन कायद्याअंतर्गत असणारे सर्व नियम बंधनकारक आहेत, तसेच गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट व इन्शुरन्स नसल्यामुळे ४ कोटी ६९ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड वर्षभरात वसूल करण्यात आला आहे.

गेले अनेक दिवस मोबाइलचा वापर करीत वाहन चालविणाऱ्या नागरिकांत वाढ झाली आहे. तसेच सध्या गाडीला आरसे न लावणाऱ्या वाहनचालकांना समज देऊन त्यांना आरसे लावण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच गाडीला आरसा नसल्यामुळे मोटरसायकलस्वाराकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.- रवींद्र शिंदे,  वाहतूक पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी