शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

उमटे धरणातील दूषित पाण्यामुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:54 IST

रामराज परिसरातील उमटे धरणातून तब्बल ६२ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील रामराज परिसरातील उमटे धरणातून तब्बल ६२ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प नुसता नावालाच उभारला असल्याने सुमारे एक लाख २० हजारांच्या लोकसंख्येला अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे, यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बेफिकीर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या मागणीचे निवेदन आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने विविध सरकारी यंत्रणांना दिलेआहे.उमटे धरणातून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची जुनीच मागणी आहे. गावातील सुशिक्षित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबतचा विषय लावून धरल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण योजना मंजूर केली होती. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुधारित उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी ५१ लाख ८० हजार १९२ रु पयांचा निधी २०१४-१५ साली मंजूर करण्यात आला. धरणातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ४.५ द.ल.घ.मी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. असे असतानाही ग्रामस्थांना अशुद्ध, मातीमिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिसरातील तब्बल ६२ गावांतील सुमारे एक लाख २० हजार नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र, त्यालाही बराच अवधी लोटला आहे. त्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागणे हे लाजिरवाणे आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी जिल्हा परिषदेने खेळ सुरू केला आहे, असे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. अशा कामचुकार, बेफिकीर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केलीआहे.याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.>अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातसरकारी यंत्रणा उमटे धरणाच्या गाळाच्या तसेच अशुद्ध पाण्याच्या बाबतीत कोणतीही कार्यवाही करत नाही. म्हणून परिसरातील गावातील पदवीधर तरु णांनी १ मे २०१९ रोजी रोजी धरणाचा गाळ काढण्यासंदर्भात गांधीगिरीने दिवसभर श्रमदान करून सरकार आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने फक्त वेळकाढूपणा केला. वेळीच धरणातील गाळ काढला असता तर आज गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली नसती. अशुद्ध पाणीपुरवठा करून एक प्रकारे विषच पिण्यासाठी दिले जात आहे. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या अर्जावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही अ‍ॅड. पाटील यांनी दिला.>धरणातील गाळ काढला नाहीमोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. त्यामुळे या योजनेतील निधी नक्की कोणी आणि कोठे जिरवला आहे. यासाठी लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद आहे.उमटे धरण योजना निर्माण केल्यानंतर गेल्या ४० वर्षांत या धरणाचा गाळ काढलेला नाही.हा गाळ काढण्यासंदर्भात स्थानिक सामाजिक संस्था तसेच आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी यांच्या वतीने १४ जून २०१८ रोजी तक्र ार अर्ज करण्यात असल्याकडेही निवेदनातून लक्ष वेधलेआहे.>साखरचौथ गणेशोत्सवात उमटे धरणातील अशुद्ध पाण्याचे पडसादनुकत्याच पार पडलेल्या साखरचौथ गणेशोत्सवातही उमटे धरणातील अशुद्ध पाण्याचे पडसाद दिसून आले.भोनंग येथील सार्वजनिक साखरचौथ गणेश मंडळाने उमटे धरणाचा देखावा उभा केला होता.धरणाच्या माध्यमातून अशुद्ध पाण्याचा कसा पुरवठा होतो. हे शेखर झावरे, शेखर शेळके आणि जयेश शेळके या तरुणांनी आपल्या संकल्पनेतून सर्वांच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न केला आहे.सोशल मीडियावरही याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्याने हजारो लाइक आणि व्यवस्थेविरोधात जनक्षोभाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.>उमटे धरणातून गढूळ पाणीपुरवठा होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. काही तांत्रिक अडथळे होते, त्याबाबतचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील आठ दिवसांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात येऊन नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.- आर. पी. कोळी,कार्यकारी अभियंता