शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रस्ताची रुंदी कमी केल्याने कर्जतकरांमधून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:08 IST

विकास आराखड्यात ९ मीटरचा रस्ता : प्रत्यक्षात सात मीटर रुंदीचे काम सुरू

विजय मांडे कर्जत : कर्जत नगर परिषद हद्दीत मुख्य रस्त्यावरील मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालयदरम्यानचे काम शहरातील अनेक रस्ते झाले तरी अद्याप रखडले आहे. शहराच्या विकास आराखड्यात हा रस्ता नऊ मीटर लांबीचा आहे. मात्र नगर परिषदेच्या अभियंत्यांनी तो सात मीटरवर आणला आहे. अरुंद रस्त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. नगर परिषदेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, पालिका पुन्हा विकास आराखड्याप्रमाणे नऊ मीटरचा रस्ता करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगर परिषदेकडून संबंधित रस्त्याचे काम करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी, नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर नवीन मुख्याधिकारी रुजू झाले असून, त्याच कालावधीत मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्याचे आरसीसी काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने ठेकेदार कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदाराने रस्त्यासाठी खोदकामही सुरू केले. मात्र हा रस्ता अरुंद केला जाणार असल्याचा संशय स्थानिकांना वाटू लागला. त्यांनी कर्जत नगर परिषदेचे नगर अभियंता मनीष गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित रस्ता सात मीटर रुंदीचा होत असल्याचे सांगितले. याबाबत काही दिवसांपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांची भेट घेतली. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन हे काम ईस्टीमेंटप्रमाणेच व्हावे आणि त्याप्रमाणे रस्त्याचे काम केले जात नाही तोपर्यंत खोदून ठेवलेला रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून या प्रकरणी निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन हवेतच विरल्याची जाणीव होत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना झाली आहे.मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप या खणलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिलेले नाहीत. तसेच रस्त्याची पाहणीदेखील केलेली नाही. मात्र संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम थांबविले आहे.कर्जत शहरात मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय या मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले आहे. स्थानिक नागरिक आणि भाजपने रस्त्याच्या रुंदीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विकास आराखड्याची माहिती घेऊन निर्णय घेऊ. - पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जतकर्जत शहरात सर्व रस्ते झाले, पण मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय हा रस्ता अद्याप झाला नाही. नऊ मीटर रुंदीचा रस्ता सात मीटर करण्यासाठी काम अपूर्णावस्थेत ठेवण्यात आले आहे. विकास आराखड्याप्रमाणेच काम झाले पाहिजे. - रमाकांत जाधव, भाजप संपर्क प्रमुख