शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

अंबोली कालव्याचे काम रखडले

By admin | Updated: March 26, 2016 02:39 IST

अंबोली धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. तथापि धरण क्षेत्रातील

मुरुड : अंबोली धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. तथापि धरण क्षेत्रातील अंबोली, शिघ्रे आणि वावडुंगी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील शेतकरी धरणाचे काम रखडल्यामुळे दुपिकी जमीन कसू शकत नाहीत. अंबोली धरण लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या व डाव्या कालव्याचे काम जून २०१५ पासून बंद असल्यामुळे धरण रेषेखालील ६१६ हेक्टर क्षेत्रावर भाताचे खरीप पिकावर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. उजवा तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाजदे, शिघ्रे, नवी वाडी या गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर तर डावा तीर कालव्याकरिता अंबोली, गोयगान, खारअंबोली ग्रामस्थांची जवळपास तेवढीच जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे.धरणग्रस्तांना अंशत: मोबदल्याचे वाटप झाले तर काही शेतकऱ्यांना तो मिळायचा बाकी आहे. उपलब्ध निधीप्रमाणे उजवा व डाव्या तीराचे काम अनुक्रमे १ ते १.५० किमी पेक्षा पुढे न सरकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसते. दुपिकी पिकांसाठी कालव्याचे काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण सुशिक्षित युवकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीशिवाय दुसरा मार्ग नाही. धरणाचे काम तातडीने सुरू व्हावे, असे मत अंबोलीचे सरपंच यांनी व्यक्त केले.