शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

आंबोली-आगरदांडा राज्यमार्गाची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:43 IST

तीन वर्षांपासून काम रखडले । साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघातांचा धोका

आगरदांडा : रोहा-भालगाव-मुरूड राज्यमार्गावरील आंबोली ते आगरदांडा दरम्यानच्या रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. तीन वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण झालेले नाही. या मार्गावरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, महाड, माणगावकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. दिघी-आगरदांडा बंदर प्रकल्पाकडे जाणारा हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो.

राज्यमार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. मात्र साडेतीन मीटरचा मार्ग अजूनही अरुंद असून उंचीमुळे साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. आंबोली ते खोकरी मार्गावर बांधकाम विभागाकडून तीन वर्षात केवळ पॅचवर्क करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे भरले नसल्याने प्रवासी व चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रुग्ण तसेच वयोवृद्ध, गर्भवतींना तर प्रवास नकोसा होतो. अनेक तक्रारी करूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जंजिरा किल्ला, कुडे-मांदाड लेणी जाण्यासाठी आगरदांडा जेट्टी मार्गाचा वापर पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. हा मार्ग तीन वर्षांपूर्वीच कार्पेट-डांबरी होणे गरजेचे होते; मात्र याबाबत केवळ घोषणाच झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaigadरायगड