शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:44 IST

संडे अँकर । कामगार, निधीचा अभाव : पावसाळ्यात धोका कायम

सिकंदर अनवारे ।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. यामुळे पावसाळ्यात या तिन्ही पुलांचा धोका कायम राहिला आहे.तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर पुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये पुलांची पाया दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. तर आंबेत आणि टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी पूल उचलले जाणार आहेत. मात्र कामगार, निधीचा अभावामुळे काम रखडले आहे.महाड जवळील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानीही झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांचे पाण्याखालील भागाचे निरीक्षण आणि तपासणी केल्यानंतर पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणाऱ्या एजन्सीकडून सुचवण्यात आले.आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत. शिवाय हे तिन्ही पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे आहेत. यामुळे पुलांना विशेष महत्त्व आहे. पुलांवरून सातत्याने अवजड वाहनांची आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून यादरम्यान या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक महाड मार्गे वळवण्यात आली आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल बेअरिंग पद्धतीचे आहेत. पुलांना जवळपास ४० वर्षे झाली आहेत. यामुळे पुलाखालील भागात दुरुस्ती केली जात आहे. पाण्याखाली असलेली पायाचे काँक्रिट निखळले आहे. ते काढून पुन्हा आधुनिक पद्धतीचे काँक्रिट लावले जाणार आहे. आंबेत पुलाच्या बेअरिंग नादुरुस्त झाल्या आहेत. या बेअरिंग दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. आंबेत आणि दादली पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती तर टोळ पुलाच्या पायाला उभ्या भेगादेखील आधुनिक पद्धतीने भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाहेरून काँक्रिटचे आवरण केले जाणार आहे. या पुलाच्यादेखील बेअरिंग बदलल्या जाणार आहेत. असेच काम दादली पुलाचेदेखील केले जाणार आहे. दादली पुलाचा पाया आणि खालील खडक यामध्ये तयार झालेली पोकळी काँक्रिटच्या साहाय्याने भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कामगार व निधीअभावी ही कामे ठप्प झाली आहेत.टोळ, दादली, आंबेत तिन्ही पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका दुरुस्तीकामांनाही बसला आहे. निधी आणि कामगार नसल्याने हे काम सध्या थांबले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असल्याने काम पूर्ण होणे शक्य नाही.- शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग