शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

आंबेत पूल वाहतुकीस खुला; नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:12 IST

वर्दळीत अडचणी : सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

म्हसळा : सद्य:स्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विषाणू संसर्ग रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदी जोडमार्गावरील आंबेत पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदारीस तीन दिवसांपासून प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंद करण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडल्याने आणि अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत असल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आंबेत पूल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांतील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग येथे जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यांतील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेदी-विक्री सुरू असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते. आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाउन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा झाला. अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.

आंबेत पूलमार्ग पूर्ववत चालू करण्यासाठी लोकांनी रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. खा. तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवस बंद केलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.