शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

आंबेत पूल वाहतुकीस खुला; नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:12 IST

वर्दळीत अडचणी : सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

म्हसळा : सद्य:स्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विषाणू संसर्ग रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदी जोडमार्गावरील आंबेत पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदारीस तीन दिवसांपासून प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंद करण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडल्याने आणि अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत असल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आंबेत पूल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांतील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग येथे जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यांतील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेदी-विक्री सुरू असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते. आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाउन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा झाला. अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.

आंबेत पूलमार्ग पूर्ववत चालू करण्यासाठी लोकांनी रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. खा. तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवस बंद केलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.