शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अनधिकृत बांधकामाविरोधात आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:37 IST

नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

कर्जत : तालुक्यातील नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याविषयी गेले दीड ते दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विजय हजारे यांनी शासन दरबारी लेखी तर कधी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, शासन अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीऐवजी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.अनेक कार्यालयाच्या अधिकाºयांनी लेखी पत्र देवून कारवाई करण्याचा शब्द दिला, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. अधिकाºयांच्या खोट्या भूलथापांना कंटाळून विजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी आमरण उपोषण सुरू केले आहे.हजारे यांच्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (अलिबाग) अधिकारी प्रत्यक्षात येत नाही, आणि बांधकाम तोडण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात रस्त्यालगत संबंधित अधिकाºयांनी अधिकाराचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. जाणीवपूर्वक इमारतीची बांधकामे न थांबविणे किंवा काढून टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. विभागातील अधिकाºयांनी ७६ बांधकामे अनधिकृत ठरवली असूनही सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी सदनिकांची खरेदी-विक्र ी ही थांबविण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाºयांनी संदर्भपत्राचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा नोंदवून अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी तसेच अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर तंटामुक्त अध्यक्ष विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.२०१७ पासून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात नेरळ-कळंब रस्ता, नेरळ-कशेळे व नेरळ व बोपेले रस्ता व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यालगत होणाºया नियमबाह्य अनधिकृत बांधकामे थांबविण्याबाबत शासन दरबारी सतत अर्ज करीत आहे. रस्त्यालगत संबंधित अधिकारी ग्रामसेवक, तलाठी मंडळाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय प्रांत अधिकारी, उपअभियंता बांधकाम उपविभाग, दुय्यम निबंधक कर्जत, नेरळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हाधिकारी या सक्षम अधिकाºयांनी सदर रस्त्यावरून विकासकामांना भेटी देत, फिरती करून प्रवास भत्ताही घेतला आहे.