शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भातशेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आंबा, भाजीपाला लागवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:14 IST

रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा.

कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले.रायगड जिल्हा विकास मंडळ व अलिबाग तालुका आंबा बागायतदारांची सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने हाशिवरे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकºयांनी प्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही शेळके यांनी सांगितले. यावेळी कृषी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.मेळाच्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल होते. कोकणात आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहोराचे संवर्धन महत्त्वाचे आहे. कारण याचवेळी अनेक रोगांचे आक्रमण होते. ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व औषधांच्या फवारण्यासाठी कृषी अधिकाºयांचे व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदशर््न तसेच मान्यवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाºया निमखाºया पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मोकल यांनी सांगितले.एपीएमसीमध्ये शेतकºयांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात विक्री केंद्र उभारणे, आंध्र व कर्नाटकच्या आंब्याचे आक्रमण रोखण्यासाठी कोकण हापूसचे ब्रँडिंग करणे, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. कोकण हापूसला यूएईबरोबरच आशिया खंडात देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेता सेंद्रिय आंबा व भाजीपाला उत्पादनावर भर द्यावा, असेही आवाहन केले.आंब्यावरील कीड रोगाचे नियंत्रण, औषध आंबा मोहोराचे संरक्षण, शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. अविनाश शिंदे यांनी तर सर्व प्रकारच्या अन्य व्यवसायावर तारापूर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रकाश शिंगारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Raigadरायगड