शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

२ लाख ५६ हजार जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:52 IST

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी दोन वर्षांतून एकदा त्याच्या शेतजमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. २०१७-१८ ते २०१८-१९ या द्विवार्षिक उपक्रमात जिल्ह्यात एकूण २५ हजार ६३३ नमुने काढण्यात आले. त्याद्वारे दोन लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. २०१९-२०मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली. या १५ गावांतून चार हजार १६४ जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची निवड करून, तेथील मातीनमुने जमा करून जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग येथील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.जमिनीचे आरोग्य चांगले राहिल्यास माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते. राज्यातील पीक जमिनीपेक्षा रायगड जिल्ह्यातील मातीमध्ये सामू (पीएच) उत्ताम आहे. जिल्ह्यातील पीक जमीन उत्तम असून जमिनीत सेंद्रीयाचे प्रमाण चांगले आहे. आपल्या पुढील पिढीसाठी जमिनीची ही सुपिकता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्याप्रमाणे पिकाचे नियोजन करावे यासाठी शासनामार्फत प्रचार आणि प्रसार सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.>माती परीक्षण का करावे?माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारणपणे जमिनीचा सामू (पीएच), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्बन, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते, त्यानुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.>उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत मिळतेमाती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच, पण अन्नद्रव्यांवर होणाºया खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठीही मदत होते; म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.