शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ५६ हजार जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:52 IST

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी दोन वर्षांतून एकदा त्याच्या शेतजमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. २०१७-१८ ते २०१८-१९ या द्विवार्षिक उपक्रमात जिल्ह्यात एकूण २५ हजार ६३३ नमुने काढण्यात आले. त्याद्वारे दोन लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. २०१९-२०मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली. या १५ गावांतून चार हजार १६४ जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची निवड करून, तेथील मातीनमुने जमा करून जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग येथील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.जमिनीचे आरोग्य चांगले राहिल्यास माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते. राज्यातील पीक जमिनीपेक्षा रायगड जिल्ह्यातील मातीमध्ये सामू (पीएच) उत्ताम आहे. जिल्ह्यातील पीक जमीन उत्तम असून जमिनीत सेंद्रीयाचे प्रमाण चांगले आहे. आपल्या पुढील पिढीसाठी जमिनीची ही सुपिकता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्याप्रमाणे पिकाचे नियोजन करावे यासाठी शासनामार्फत प्रचार आणि प्रसार सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.>माती परीक्षण का करावे?माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारणपणे जमिनीचा सामू (पीएच), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्बन, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते, त्यानुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.>उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत मिळतेमाती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच, पण अन्नद्रव्यांवर होणाºया खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठीही मदत होते; म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.