शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 07:05 IST

नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.

उरण : नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.जेएनपीटी आणि येथील इतर बंदरांमध्ये नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांवर नेहमी अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शुक्र वार, २ फेब्रुवारीला चौथ्या बंदराचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असून, सीएमए सीजीएम कंपनीचे सेण्टॉरस हे पहिले जहाज बंदरात दाखल होणार आहे.नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणच्या वतीने द्रोणागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, जेएनपीटीने सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या नव्या बीएमसीटी बंदराची उभारणी जेएनपीटी बंदराजवळ केली आहे. सर्वाधिक लांबीचा आणि सुमारे ४८ लाख कंटेनर हताळण्याची क्षमता असलेले हे बंदर आहे. बंदरात तीन हजार नोकºया अपेक्षित आहेत. मात्र, फक्त १६५ लोकांनाच नोकºया देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५५ प्रकल्पग्रस्तांनाच काम देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे येथील अनेक सीएफएस बंद पडले असून, अनेक सीएफएस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.डीपीडी धोरणामुळे हजारो स्थानिक बेरोजगार होणार असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पांमुळे स्थानिकांचा, मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच एनएसआयजीटी, जीटीआय या बंदरात भरती केलेल्या परप्रांतीयांना नोकरीवरून काढून टाकून त्यांच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नोकरी द्यावी, या सर्व नोकरभरती प्रक्रियेमध्ये जेएनपीटीने हस्तक्षेप करावा व जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडाचा वापर प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी करावा, यासह इतर मागण्यांसाठी शुक्र वारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात १ लाख नागरिक, प्रकल्पग्रस्त सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार असल्याचे, समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोर्चाला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार भाई जगताप आदींसह इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे नोकरी व व्यवसाय बचाव समितीकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेनेचे पं. स.सदस्य दीपक ठाकूर, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड