शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 07:05 IST

नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.

उरण : नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.जेएनपीटी आणि येथील इतर बंदरांमध्ये नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांवर नेहमी अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शुक्र वार, २ फेब्रुवारीला चौथ्या बंदराचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असून, सीएमए सीजीएम कंपनीचे सेण्टॉरस हे पहिले जहाज बंदरात दाखल होणार आहे.नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणच्या वतीने द्रोणागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, जेएनपीटीने सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या नव्या बीएमसीटी बंदराची उभारणी जेएनपीटी बंदराजवळ केली आहे. सर्वाधिक लांबीचा आणि सुमारे ४८ लाख कंटेनर हताळण्याची क्षमता असलेले हे बंदर आहे. बंदरात तीन हजार नोकºया अपेक्षित आहेत. मात्र, फक्त १६५ लोकांनाच नोकºया देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५५ प्रकल्पग्रस्तांनाच काम देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे येथील अनेक सीएफएस बंद पडले असून, अनेक सीएफएस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.डीपीडी धोरणामुळे हजारो स्थानिक बेरोजगार होणार असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पांमुळे स्थानिकांचा, मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच एनएसआयजीटी, जीटीआय या बंदरात भरती केलेल्या परप्रांतीयांना नोकरीवरून काढून टाकून त्यांच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नोकरी द्यावी, या सर्व नोकरभरती प्रक्रियेमध्ये जेएनपीटीने हस्तक्षेप करावा व जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडाचा वापर प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी करावा, यासह इतर मागण्यांसाठी शुक्र वारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात १ लाख नागरिक, प्रकल्पग्रस्त सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार असल्याचे, समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोर्चाला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार भाई जगताप आदींसह इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे नोकरी व व्यवसाय बचाव समितीकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेनेचे पं. स.सदस्य दीपक ठाकूर, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड