शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 07:05 IST

नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.

उरण : नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.जेएनपीटी आणि येथील इतर बंदरांमध्ये नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांवर नेहमी अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शुक्र वार, २ फेब्रुवारीला चौथ्या बंदराचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असून, सीएमए सीजीएम कंपनीचे सेण्टॉरस हे पहिले जहाज बंदरात दाखल होणार आहे.नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणच्या वतीने द्रोणागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, जेएनपीटीने सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या नव्या बीएमसीटी बंदराची उभारणी जेएनपीटी बंदराजवळ केली आहे. सर्वाधिक लांबीचा आणि सुमारे ४८ लाख कंटेनर हताळण्याची क्षमता असलेले हे बंदर आहे. बंदरात तीन हजार नोकºया अपेक्षित आहेत. मात्र, फक्त १६५ लोकांनाच नोकºया देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५५ प्रकल्पग्रस्तांनाच काम देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे येथील अनेक सीएफएस बंद पडले असून, अनेक सीएफएस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.डीपीडी धोरणामुळे हजारो स्थानिक बेरोजगार होणार असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पांमुळे स्थानिकांचा, मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच एनएसआयजीटी, जीटीआय या बंदरात भरती केलेल्या परप्रांतीयांना नोकरीवरून काढून टाकून त्यांच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नोकरी द्यावी, या सर्व नोकरभरती प्रक्रियेमध्ये जेएनपीटीने हस्तक्षेप करावा व जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडाचा वापर प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी करावा, यासह इतर मागण्यांसाठी शुक्र वारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात १ लाख नागरिक, प्रकल्पग्रस्त सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार असल्याचे, समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोर्चाला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार भाई जगताप आदींसह इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे नोकरी व व्यवसाय बचाव समितीकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेनेचे पं. स.सदस्य दीपक ठाकूर, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड