शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:04 IST

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.

बोर्ली-मांडला : अलिबागहून मुरुडकडे सकाळी ६:१५ वाजता सुटणारी एसटी मंगळवारी ब्रेकडाउन झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसला. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.मुरुड एसटी डेपोची पार दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याच्या लायक आहेत आणि सर्व बस नवीन आणणे गरजेचे आहे. या जुन्या झालेल्या बसमुळे वारंवार या बस नादुरुस्त होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो, कारण वेळेत न पोहोचल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अशीच घटना २८ जानेवारी रोजी घडली. मंगळवारी सकाळी ६:१५ वाजता अलिबाग येथून सुटणारी मुरुड एसटी बस नेहमीप्रमाणे सुटली. या गाडीला नेहमी वर्दळ असते, याच गाडीत मुरुडसाठी येणाºया वर्तमानपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. कोर्लई येथून अनेक भाजीविक्रे त्या महिलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक ब्रेकडाउन झाली. यामुळे या बसने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला. या वेळी वाहक, चालक यांनी मुरुड आगाराशी संपर्क करून ब्रेकडाउन झालेल्या गाडीबद्दल सांगितले. त्या वेळी लवकरच नेहमीप्रमाणेगाडीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दुसºया गाडीची वाट पाहूनही बस येत नसल्याने अखेर सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच किलोमीटर पायपीट करीत कसेबसे नांदगाव गाठले. तेथून खासगी वाहनाने मुरुडला जाऊन शाळा, महाविद्यालय, आयटीआयला पोहोचले. उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले. याच गाडीत असणारे वृत्तपत्र उशिरा पोहोचल्याने विक्रेत्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.हीच बस बंद पडत नाही, तर या आगारातील अनेक फेºया मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अशा अनेक बसेस वारंवार बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी प्रवासी संघटनांनी मिळून आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात जाब विचारला असता, एका महिन्यात आगार सुस्थितीत करतो, असे वचन दिले होते; परंतु दोन महिने उलटले तरी, ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती आजही आहे.काही दिवसांपूर्वी मुरुड आगाराला राज्यात सर्वाधिक इंधन बचत म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले; पण या आगाराच्या गाड्या सतत बंद पडल्याने इंधनाची सर्वाधिक बचत झाली असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Raigadरायगड