शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:04 IST

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.

बोर्ली-मांडला : अलिबागहून मुरुडकडे सकाळी ६:१५ वाजता सुटणारी एसटी मंगळवारी ब्रेकडाउन झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसला. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.मुरुड एसटी डेपोची पार दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याच्या लायक आहेत आणि सर्व बस नवीन आणणे गरजेचे आहे. या जुन्या झालेल्या बसमुळे वारंवार या बस नादुरुस्त होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो, कारण वेळेत न पोहोचल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अशीच घटना २८ जानेवारी रोजी घडली. मंगळवारी सकाळी ६:१५ वाजता अलिबाग येथून सुटणारी मुरुड एसटी बस नेहमीप्रमाणे सुटली. या गाडीला नेहमी वर्दळ असते, याच गाडीत मुरुडसाठी येणाºया वर्तमानपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. कोर्लई येथून अनेक भाजीविक्रे त्या महिलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक ब्रेकडाउन झाली. यामुळे या बसने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला. या वेळी वाहक, चालक यांनी मुरुड आगाराशी संपर्क करून ब्रेकडाउन झालेल्या गाडीबद्दल सांगितले. त्या वेळी लवकरच नेहमीप्रमाणेगाडीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दुसºया गाडीची वाट पाहूनही बस येत नसल्याने अखेर सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच किलोमीटर पायपीट करीत कसेबसे नांदगाव गाठले. तेथून खासगी वाहनाने मुरुडला जाऊन शाळा, महाविद्यालय, आयटीआयला पोहोचले. उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले. याच गाडीत असणारे वृत्तपत्र उशिरा पोहोचल्याने विक्रेत्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.हीच बस बंद पडत नाही, तर या आगारातील अनेक फेºया मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अशा अनेक बसेस वारंवार बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी प्रवासी संघटनांनी मिळून आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात जाब विचारला असता, एका महिन्यात आगार सुस्थितीत करतो, असे वचन दिले होते; परंतु दोन महिने उलटले तरी, ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती आजही आहे.काही दिवसांपूर्वी मुरुड आगाराला राज्यात सर्वाधिक इंधन बचत म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले; पण या आगाराच्या गाड्या सतत बंद पडल्याने इंधनाची सर्वाधिक बचत झाली असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Raigadरायगड