शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:04 IST

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.

बोर्ली-मांडला : अलिबागहून मुरुडकडे सकाळी ६:१५ वाजता सुटणारी एसटी मंगळवारी ब्रेकडाउन झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसला. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.मुरुड एसटी डेपोची पार दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याच्या लायक आहेत आणि सर्व बस नवीन आणणे गरजेचे आहे. या जुन्या झालेल्या बसमुळे वारंवार या बस नादुरुस्त होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो, कारण वेळेत न पोहोचल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अशीच घटना २८ जानेवारी रोजी घडली. मंगळवारी सकाळी ६:१५ वाजता अलिबाग येथून सुटणारी मुरुड एसटी बस नेहमीप्रमाणे सुटली. या गाडीला नेहमी वर्दळ असते, याच गाडीत मुरुडसाठी येणाºया वर्तमानपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. कोर्लई येथून अनेक भाजीविक्रे त्या महिलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक ब्रेकडाउन झाली. यामुळे या बसने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला. या वेळी वाहक, चालक यांनी मुरुड आगाराशी संपर्क करून ब्रेकडाउन झालेल्या गाडीबद्दल सांगितले. त्या वेळी लवकरच नेहमीप्रमाणेगाडीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दुसºया गाडीची वाट पाहूनही बस येत नसल्याने अखेर सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच किलोमीटर पायपीट करीत कसेबसे नांदगाव गाठले. तेथून खासगी वाहनाने मुरुडला जाऊन शाळा, महाविद्यालय, आयटीआयला पोहोचले. उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले. याच गाडीत असणारे वृत्तपत्र उशिरा पोहोचल्याने विक्रेत्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.हीच बस बंद पडत नाही, तर या आगारातील अनेक फेºया मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अशा अनेक बसेस वारंवार बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी प्रवासी संघटनांनी मिळून आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात जाब विचारला असता, एका महिन्यात आगार सुस्थितीत करतो, असे वचन दिले होते; परंतु दोन महिने उलटले तरी, ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती आजही आहे.काही दिवसांपूर्वी मुरुड आगाराला राज्यात सर्वाधिक इंधन बचत म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले; पण या आगाराच्या गाड्या सतत बंद पडल्याने इंधनाची सर्वाधिक बचत झाली असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Raigadरायगड