शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

गोहत्येच्या निषेधार्थ आज अलिबाग बंद ; शहराला छावणीचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:56 IST

शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

अलिबाग : शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. बंदमुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याने शहराला पोलीस छावणीचे रूप येणार असल्याचे बोलले जाते.शुक्र वार २७ जुलै रोजी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरात गोहत्या करून तिचे मांस विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या प्रकरणी अब्दुस सय्यद, शराफत फकी आणि इंद्रीस चौधरी यांना अटक करु न न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तीनही आरोपींना बुधवार, १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच दिवशी शहरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे.गोमांस विक्रीमुळे विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अलिबाग शहर हे शांतताप्रिय शहर आहे. या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन विविध सण साजरे करण्याची परंपरा आहे.त्यामुळे शहरामध्ये गोहत्येसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी अलिबाग बंदची हाक दिली आहे. शहरातील जैन संघटना, सनातन भारत, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध व्यापारी संघटनांनी भाजपाने पुकारलेल्या अलिबाग बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच बंदमध्येही त्या सहभागी होणार असल्याने बाजारपेठेतील विविध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे.बंद पाळण्यासाठी कोणावरही निर्बंध नाहीत, परंतु जास्तीतजास्त नागरिकांनी, आस्थापनांनी बंदमध्ये सामील होऊन सहकार्य करावे, बंद शांततेमध्ये पाळण्यात यावा असे, आवाहन भाजपाचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.व्यापाºयांच्या लाखोंच्या उलाढालीवर परिणामअलिबाग शहर हे पर्यटकांच्या पसंतीचे शहर आहे. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांच्या जीवावरच येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंट, लॉजिंग, कॉटेजेस, ट्रॅव्हल्स यासह अन्य छोटे-मोठे उद्योगधंदे तग धरु न आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमार्फत रोजची लाखो रु पयांची उलाढाल होत असल्याने एक दिवसाच्या बंदमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोेलले जाते.शहरामध्ये विविध असणारी किराणा मालाची दुकाने, कपडा मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजारातील आर्थिक उलाढालही प्रचंड मोठी आहे. त्या व्यवसायावरही बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे.विविध शाळा, महाविद्यालये,बँका, सरकारी, निम सरकारी आस्थापनांना बंदची विशेष झळ बसणार नाही. असे असले तरी दैनंदिन कामांसाठी नागरिक बाहेर पडणार का हाच मोठा प्रश्न आहे.एसटी बंदमध्ये सहभागी होणार नाही. अलिबाग आगारातून नियमित गाड्या सोडण्यात येतील, मात्र आंदोलकांनी गाड्या अडवल्यास नाईलाजाने आम्हाला गाड्या सोडता येणार नाही, असे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले.शहरामध्ये १ आॅगस्ट रोजी भाजपाने बंदची हाक दिलेली आहे. आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.- दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, अलिबागअलिबागचे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे- प्रशांत नाईक,नगराध्यक्ष, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड