शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:51 IST

मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत

बोर्ली मांडला : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाच्या झळा सोसत आहे. कोकण विभागात अलिबाग येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे शनिवारचे तापमान हे ३५.६ एवढे आहे. उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.सौराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्रात अ‍ॅण्टीसायकलॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे निर्माण झाल्याने पारा चढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुजरातच्या दिशेने आलेले उष्ण वारे मुंबईत घुसल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. पुढचे तीन दिवस असेच वातावरण असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यभरात अनेक भागांत तयार झालेले उष्ण वारे बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हे वारे जमिनीवरून वाहत आहेत. परिणामी, जमीन भट्टीप्रमाणे तापली असून, डांबरही अक्षरश: वितळले आहे. अलिबागचे किमान तापमान हे ३१.८ एवढे असते. मात्र, शनिवारी अलिबाग येथे ३५.६. डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. अलिबाग येथे तापमान वाढल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहेत. येत्या दोन दिवसांत तापमान हे वाढणार असल्याचे अजयकुमार यांनी सांगितले आहे.विदर्भात चार दिवस उष्णतेची लाटविदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी वळीवाचा पाऊसही होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूरमध्ये ४४़२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे़मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत, असे मुंबई कुलाबा येथील हवामान विभागाचे वैज्ञानिक अजयकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Temperatureतापमान