शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

अलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:51 IST

मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत

बोर्ली मांडला : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाच्या झळा सोसत आहे. कोकण विभागात अलिबाग येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे शनिवारचे तापमान हे ३५.६ एवढे आहे. उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.सौराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्रात अ‍ॅण्टीसायकलॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे निर्माण झाल्याने पारा चढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुजरातच्या दिशेने आलेले उष्ण वारे मुंबईत घुसल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. पुढचे तीन दिवस असेच वातावरण असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यभरात अनेक भागांत तयार झालेले उष्ण वारे बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हे वारे जमिनीवरून वाहत आहेत. परिणामी, जमीन भट्टीप्रमाणे तापली असून, डांबरही अक्षरश: वितळले आहे. अलिबागचे किमान तापमान हे ३१.८ एवढे असते. मात्र, शनिवारी अलिबाग येथे ३५.६. डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. अलिबाग येथे तापमान वाढल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहेत. येत्या दोन दिवसांत तापमान हे वाढणार असल्याचे अजयकुमार यांनी सांगितले आहे.विदर्भात चार दिवस उष्णतेची लाटविदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी वळीवाचा पाऊसही होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूरमध्ये ४४़२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे़मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत, असे मुंबई कुलाबा येथील हवामान विभागाचे वैज्ञानिक अजयकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Temperatureतापमान