शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अल कार्गो कामगारांचा उरण तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: June 21, 2017 05:43 IST

येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी कुटुंबीयांसमवेत मंगळवारी तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी या वेळी मोर्चेकऱ्यांनी उरण तहसीलदारांकडे केली.तालुक्यात कोप्रोली येथे अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर फ्रं ट स्टेशन आहे. कंटेनर आयात-निर्यात होणाऱ्या कंटेनर लॉजिस्टिकमध्ये सध्या ३५० कामगार काम करीत असून सुमारे २५० कामगार ठेकेदारीत काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे कंटेनर बंदरातून थेट आयात-निर्यात होऊ लागल्याने कंटेनर हाताळणीचे काम कमी झाल्याचे सांगत ठेकेदार कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिले आहे. तसेच कंपनीच बंद करण्याच्या निर्णयाप्रत मालकवर्ग येवून ठेपला आहे. तसेच ठेकेदारीत काम करणाऱ्या १५० कामगारांना कमी करण्याबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. यामुळे कामगारांनी २३ जूनपासून कंपनीविरोधात बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र आंदोलनाला कंपनीचे मालक शशिकांत शेट्टे आणि आदर्श हेगडे यांनी दाद दिली नसल्याने मंगळवारी (२०) कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी (२०) तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. यामध्ये महिला, मुलांचाही समावेश होता. मोर्चेकऱ्यांनी कंपनीच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.यावेळी शिष्टमंडळाने उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनाही निवेदन देवून चर्चा केली. यावेळी अल कार्गो कंपनीचे अंबादास यादव, राजेंद्र श्रीवास्तव, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ भोईर, रुपेश पाटील, किरीट पाटील, जे. डी. जोशी, सीमा घरत इतर मान्यवर उपस्थित होते. कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, रुपेश पाटील आणि कामगार प्रतिनिधींनी कामगारांच्या व्यथा मांडून कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी कामगारांच्या वतीने शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली. शिष्टमंडळ आणि कंपनी प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून मालकांशी चर्चा करून कामगारांच्या न्याय हक्काचा २२ जूनपर्यंत निर्णय घेण्याची तंबी उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिली आहे.