शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

अल कार्गो कामगारांचा उरण तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: June 21, 2017 05:43 IST

येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी कुटुंबीयांसमवेत मंगळवारी तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी या वेळी मोर्चेकऱ्यांनी उरण तहसीलदारांकडे केली.तालुक्यात कोप्रोली येथे अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर फ्रं ट स्टेशन आहे. कंटेनर आयात-निर्यात होणाऱ्या कंटेनर लॉजिस्टिकमध्ये सध्या ३५० कामगार काम करीत असून सुमारे २५० कामगार ठेकेदारीत काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे कंटेनर बंदरातून थेट आयात-निर्यात होऊ लागल्याने कंटेनर हाताळणीचे काम कमी झाल्याचे सांगत ठेकेदार कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिले आहे. तसेच कंपनीच बंद करण्याच्या निर्णयाप्रत मालकवर्ग येवून ठेपला आहे. तसेच ठेकेदारीत काम करणाऱ्या १५० कामगारांना कमी करण्याबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. यामुळे कामगारांनी २३ जूनपासून कंपनीविरोधात बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र आंदोलनाला कंपनीचे मालक शशिकांत शेट्टे आणि आदर्श हेगडे यांनी दाद दिली नसल्याने मंगळवारी (२०) कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी (२०) तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. यामध्ये महिला, मुलांचाही समावेश होता. मोर्चेकऱ्यांनी कंपनीच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.यावेळी शिष्टमंडळाने उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनाही निवेदन देवून चर्चा केली. यावेळी अल कार्गो कंपनीचे अंबादास यादव, राजेंद्र श्रीवास्तव, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ भोईर, रुपेश पाटील, किरीट पाटील, जे. डी. जोशी, सीमा घरत इतर मान्यवर उपस्थित होते. कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, रुपेश पाटील आणि कामगार प्रतिनिधींनी कामगारांच्या व्यथा मांडून कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी कामगारांच्या वतीने शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली. शिष्टमंडळ आणि कंपनी प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून मालकांशी चर्चा करून कामगारांच्या न्याय हक्काचा २२ जूनपर्यंत निर्णय घेण्याची तंबी उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिली आहे.