शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मजुरी वाढल्याने शेती झाली परवडेनाशी

By admin | Updated: July 16, 2016 02:02 IST

रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या

नांदगाव : रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या व मेहनतीच्या मानाने शेती परवडेनाशी झाली आहे.एखाद्या भातशेतीचे जर १ खंडी म्हणजेच ८०० ते १००० किलो भात पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना तेवढाच आठ दहा हजारांचा खर्च होतो. भात पेरणीपासून शेतकऱ्यांना चार ते पाच नांगर जमीन नांगरणीसाठी लागतात. सध्या एका नागराला दिवसाला ६०० रुपये द्यावे लागतात. किमान अडीच हजारांचा खर्च होतो. ट्रॅक्टर चालकही एका तासाचे चारशे ते पाचशे घेतो. नांगरापेक्षा त्याला जादा खर्च येतो, असे शेतकरी सांगतात. भात पेरणीपासून बारा पंधरा मजूर लागतात. त्यांच्या मजुरीचा दर पुरुषाला २५० रुपये तर स्त्रीला २०० रुपये आहे. शिवाय मळणीचे दर वेगळे असतात. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण व संध्याकाळी पोस्त द्यावा लागतो. तण काढणे, खते, औषधे व राखणीसाठीही पैसे मोजावे लागतात.जाड्या भाताला एका मणासाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. तर बारीक भाताला एक मणासाठी ४०० रुपये ते ६०० चा भाव मिळतो. त्यामुळे भात पिकाच्या उत्पादनासाठी जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चाचे पीक येते. पाऊस व्यवस्थित पडला तर ठीक अन्यथा शेतकरी तोट्यात जाते. त्यामुळे अलीकडे शेतकरी शेती करायला मागत नाहीत. एखाद्या जमीन मालकाची शेती दुसऱ्या शेतकऱ्याने कसण्यास घेतली तर पूर्वी येणाऱ्या पिकाचे दोन समान वाटे केले जायचे त्यास ग्रामीण शेतकरी अरदल असे म्हणतात. पण आता मात्र चार वाट्यांपैकी तीन वाटे कसणारा घेतो व फक्त एक वाटा मालकाला मिळतो. परिणामी बऱ्याच जमीन मालकांनी आपली जमीन ओसाड टाकली आहे किंवा ओसाड जावू नये म्हणून काहीही मोबदला न देता जमीन पिकवा या निर्णयापर्यंत मालक आले आहेत, तर काहींनी आपली शेतीच विकली आहे. (वार्ताहर)