शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मजुरी वाढल्याने शेती झाली परवडेनाशी

By admin | Updated: July 16, 2016 02:02 IST

रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या

नांदगाव : रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या व मेहनतीच्या मानाने शेती परवडेनाशी झाली आहे.एखाद्या भातशेतीचे जर १ खंडी म्हणजेच ८०० ते १००० किलो भात पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना तेवढाच आठ दहा हजारांचा खर्च होतो. भात पेरणीपासून शेतकऱ्यांना चार ते पाच नांगर जमीन नांगरणीसाठी लागतात. सध्या एका नागराला दिवसाला ६०० रुपये द्यावे लागतात. किमान अडीच हजारांचा खर्च होतो. ट्रॅक्टर चालकही एका तासाचे चारशे ते पाचशे घेतो. नांगरापेक्षा त्याला जादा खर्च येतो, असे शेतकरी सांगतात. भात पेरणीपासून बारा पंधरा मजूर लागतात. त्यांच्या मजुरीचा दर पुरुषाला २५० रुपये तर स्त्रीला २०० रुपये आहे. शिवाय मळणीचे दर वेगळे असतात. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण व संध्याकाळी पोस्त द्यावा लागतो. तण काढणे, खते, औषधे व राखणीसाठीही पैसे मोजावे लागतात.जाड्या भाताला एका मणासाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. तर बारीक भाताला एक मणासाठी ४०० रुपये ते ६०० चा भाव मिळतो. त्यामुळे भात पिकाच्या उत्पादनासाठी जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चाचे पीक येते. पाऊस व्यवस्थित पडला तर ठीक अन्यथा शेतकरी तोट्यात जाते. त्यामुळे अलीकडे शेतकरी शेती करायला मागत नाहीत. एखाद्या जमीन मालकाची शेती दुसऱ्या शेतकऱ्याने कसण्यास घेतली तर पूर्वी येणाऱ्या पिकाचे दोन समान वाटे केले जायचे त्यास ग्रामीण शेतकरी अरदल असे म्हणतात. पण आता मात्र चार वाट्यांपैकी तीन वाटे कसणारा घेतो व फक्त एक वाटा मालकाला मिळतो. परिणामी बऱ्याच जमीन मालकांनी आपली जमीन ओसाड टाकली आहे किंवा ओसाड जावू नये म्हणून काहीही मोबदला न देता जमीन पिकवा या निर्णयापर्यंत मालक आले आहेत, तर काहींनी आपली शेतीच विकली आहे. (वार्ताहर)