शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाण्यामुळे शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:03 IST

अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे.

- राजू भिसे नागोठणे : अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे. त्यामुळे भातशेती जळून जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्यासह संबंधित शेतकºयांनी केला आहे. संबंधित प्रतिनिधीने या जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले आहे. गळतीमुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. ही वाहिनी शेजारील रिलायन्स कंपनीची असल्याचे स्पष्ट होत असल्याने याबाबत संबंधित अधिकाºयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ न शकल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फुटणाºया या सांडपाणी वाहिनीच्या फुटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.विभागातील शिहू, मुंढाणी, आटिवली, गांधे, चोळे, झोतीरपाडा, तरशेत, जांभुळटेप आदी गावांतील शेतकºयांच्या बहुतांशी जमिनी पूर्व बाजूला असणाºया अंबा नदीलगत आहेत. येथील रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित दूषित पाणी वाहून नेणारी वाहिनी याच भागातून गेली असल्यामुळे ती वारंवार फुटत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कंपनीकडे वारंवार तक्र ार करीत असलो तरी, ते कायम दुर्लक्ष करीत असल्याचे ते सांगतात. पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचत असल्याने हे दूषित पाणी शेतात पसरते आणि नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात.नदीत किंवा खाडीतसुद्धा हे पाणी पसरत असल्यामुळे होणाºया प्रदूषणामुळे मिळणाºया मासळीला रासायनिक दुर्गंधी येत असल्याने मच्छीमार संकटात सापडले असल्याचे मोकल यांचे म्हणणे आहे. मुंढाणी येथील शेतकºयाने सांगितले की, जून महिन्यात भाताची केलेली लागवड या दूषित पाण्यामुळे जळून गेल्यामुळे जुलैच्या अखेरीस दुसºयांदा लागवड केली होती. मात्र, माझे शेताच्या ५० मीटर अंतरावर पुढे ही वाहिनी फुटली असल्यामुळे तिकडच्या शेतातील दूषित पाणी माझ्या शेतात वाहून आल्यामुळे दुसºयांदासुद्धा शेतीची वाट लागली असून, आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल त्यांनी संबंधित प्रतिनिधीकडे व्यक्त केला. वेळोवेळी सांगूनसुद्धा कंपनी आमच्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने सर्व शेतकºयांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे मोकल यांनी या वेळी स्पष्ट केले.