शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

रासायनिक सांडपाण्यामुळे शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:03 IST

अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे.

- राजू भिसे नागोठणे : अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे. त्यामुळे भातशेती जळून जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्यासह संबंधित शेतकºयांनी केला आहे. संबंधित प्रतिनिधीने या जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले आहे. गळतीमुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. ही वाहिनी शेजारील रिलायन्स कंपनीची असल्याचे स्पष्ट होत असल्याने याबाबत संबंधित अधिकाºयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ न शकल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फुटणाºया या सांडपाणी वाहिनीच्या फुटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.विभागातील शिहू, मुंढाणी, आटिवली, गांधे, चोळे, झोतीरपाडा, तरशेत, जांभुळटेप आदी गावांतील शेतकºयांच्या बहुतांशी जमिनी पूर्व बाजूला असणाºया अंबा नदीलगत आहेत. येथील रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित दूषित पाणी वाहून नेणारी वाहिनी याच भागातून गेली असल्यामुळे ती वारंवार फुटत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कंपनीकडे वारंवार तक्र ार करीत असलो तरी, ते कायम दुर्लक्ष करीत असल्याचे ते सांगतात. पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचत असल्याने हे दूषित पाणी शेतात पसरते आणि नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात.नदीत किंवा खाडीतसुद्धा हे पाणी पसरत असल्यामुळे होणाºया प्रदूषणामुळे मिळणाºया मासळीला रासायनिक दुर्गंधी येत असल्याने मच्छीमार संकटात सापडले असल्याचे मोकल यांचे म्हणणे आहे. मुंढाणी येथील शेतकºयाने सांगितले की, जून महिन्यात भाताची केलेली लागवड या दूषित पाण्यामुळे जळून गेल्यामुळे जुलैच्या अखेरीस दुसºयांदा लागवड केली होती. मात्र, माझे शेताच्या ५० मीटर अंतरावर पुढे ही वाहिनी फुटली असल्यामुळे तिकडच्या शेतातील दूषित पाणी माझ्या शेतात वाहून आल्यामुळे दुसºयांदासुद्धा शेतीची वाट लागली असून, आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल त्यांनी संबंधित प्रतिनिधीकडे व्यक्त केला. वेळोवेळी सांगूनसुद्धा कंपनी आमच्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने सर्व शेतकºयांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे मोकल यांनी या वेळी स्पष्ट केले.