शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृहच नाही !

By admin | Updated: September 13, 2016 02:37 IST

तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी

नांदगाव / मुरूड : तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी आग्रही मागणी आगरदांडा ग्रामपंचायत उपसरपंच बाबासाहेब अर्जबेगी यांनी केली आहे. मुरूडसह श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांना जोडणारी सतत प्रवाशांची वर्दळ असणारी आगरदांडा ही महत्त्वाची जेट्टी म्हणून गणली जाते. ऐतिहासीक जंजिरा किल्ला, दिवेआगारचे सुवर्ण गणेशमंदिर, श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन, दक्षिण काशी म्हणून मान्यता असलेल्या हरिहरेश्वर तसेच समुद्र किनारे पाहण्यासाठी जंगल जेट्टी तसेच प्रवासीजल वाहतूक सेवा वर्षभर आगरदांडा ते दिघी अशी सुरु असते. त्यामुळे शेकडो पर्यटकांची वर्दळ बंदरावर असते. परंतु येथिल स्वछतागृह मेरीटाईम बोर्डाच्या आदेशाने पाडण्यात आले असून त्या जागी पोलीस गस्तीसाठी गेस्टरुम उभारले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांची विशेषत: महिलांची स्वच्छता गृह नसल्याने कुंचबणा होत आहे. प्रसंगी महिला प्रवाशांना आयसीआयसी कोस्टगार्डच्या शौचालयाचा वापर करणे भाग पडते. मेरी टाईम बोर्डाचे सर्व सोयींनी युक्त कॉर्पोरेट टच आॅफीस उद्घाटनाअभावी रखडले आहे. बंदर आधिकारी धोत्रे यांच्याशी संपर्कसाधला असता उदघाटनाविषयी वरिष्ठच आधिकृत काय ते सांगू शकतील असे ते म्हणाले. सुवर्ण दुर्ग शिपींग कं . तसेच दिघी जलप्रवासी वाहतूक कंपन्या प्रवाशांची तसेच अवजड वाहनांची ने-आण आगरदांडा ते दिघी बंदर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करीत असतात. तथापि पर्यटक तसेच स्थानिकांची वर्दळ मोठया प्रमाणावर असूनही स्वछते कडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी मेरीटाईम बोर्डाने स्वच्छता गृहाची व इतर सुविधांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.