शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आदिवासींची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:52 IST

नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले.

कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी २६ जानेवारीपर्यंत रस्ता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ‘आदिवासींची वाट बिकट’ असल्याने येथील नागरिकांना रस्त्याअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.पिंकी मूळची याच तालुक्यातील गैरकामथमधील होती. तीनच वर्षांपूर्वी तिचे खाणीची वाडी येथील मंगेश वाघमारे या तरु णाशी लग्न झाले होते. त्या दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाच मागील आठवड्यात अचानक पिंकीची तब्बेत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. वाडीपासून जवळच असलेले बीड आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने नाइलाजाने तिला पहाटे कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रस्ता नसल्याने झोळीतून नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आता तरी विकासाच्या भूलथापा मारणाºया पुढाºयांना या वाडीकडील रस्ता करण्याची बुद्धी सुचेल का? असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे.आदिवासी भागात विकास झपाट्याने होत आहे, असा डांगोरा नेहमीच पिटला जातो; परंतु आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, सरकारने आदिवासींची थट्टाच चालविली आहे. अनेक आदिवासीवाड्यांतील विद्यार्थी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेतात. डोंगर-दºयातून मातीच्या रस्त्यांच्या पायवाटा शोधत ७-८ कि.मी.ची पायपीट करीत शिक्षण घेतात. हे हाल लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत का? असा प्रश्नदेखील आदिवासींनी उपस्थित केला असून शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.>खाणीकडे जाणारी मृत्यूची बिकट वाटसभोवताली उंच उंचच डोंगर, घनदाट अरण्य, दाट झाडी, सहा ते सात फूट उंच गवत, ओढे -नाले, खाच-खळगे कसेबसे पार करत बीड गावावरून खाणीच्या वाडीकडे जावे लागते. उन्हाळ्यातील पायवाट पावसाळ्यातील उगवलेल्या जंगली झाडाझुडपांमध्ये कधीच दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे झाडाझुडपातून वाट काढत खाणीची वाडी गाठावी लागते. ही वाट काढताना गवतात लपलेले साप, विंचू कधी दंश करतील याचा नेम नाही. जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांच्या हल्ल्याची ही तेवढीच भीती असते. यामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्र मण करावे लागते.>रस्त्याअभावी आमच्या आदिवासीवाडीतील महिलेला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. बीड ते खाणीची वाडी, तसेच स्टेशन-ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर करावा, रस्त्याअभावी मृत्यू होणे ही लाजिरवाणी बाब आहे, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ २६ जानेवारीला आंदोलनात सहभागी होऊ.- अरुण वाघमारे, स्थानिक ग्रामस्थ>पावसाळ्यात तर ओढे-नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे पायवाटेतील ओढे-नाले पार करताना वाहून जाण्याची भीती असते. शाळेतील लहान मुले, गर्भवती महिला यांची तर फारच तारांबळ उडते.- अशोक जंगले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा