शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आदिवासींची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:52 IST

नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले.

कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी २६ जानेवारीपर्यंत रस्ता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ‘आदिवासींची वाट बिकट’ असल्याने येथील नागरिकांना रस्त्याअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.पिंकी मूळची याच तालुक्यातील गैरकामथमधील होती. तीनच वर्षांपूर्वी तिचे खाणीची वाडी येथील मंगेश वाघमारे या तरु णाशी लग्न झाले होते. त्या दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाच मागील आठवड्यात अचानक पिंकीची तब्बेत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. वाडीपासून जवळच असलेले बीड आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने नाइलाजाने तिला पहाटे कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रस्ता नसल्याने झोळीतून नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आता तरी विकासाच्या भूलथापा मारणाºया पुढाºयांना या वाडीकडील रस्ता करण्याची बुद्धी सुचेल का? असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे.आदिवासी भागात विकास झपाट्याने होत आहे, असा डांगोरा नेहमीच पिटला जातो; परंतु आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, सरकारने आदिवासींची थट्टाच चालविली आहे. अनेक आदिवासीवाड्यांतील विद्यार्थी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेतात. डोंगर-दºयातून मातीच्या रस्त्यांच्या पायवाटा शोधत ७-८ कि.मी.ची पायपीट करीत शिक्षण घेतात. हे हाल लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत का? असा प्रश्नदेखील आदिवासींनी उपस्थित केला असून शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.>खाणीकडे जाणारी मृत्यूची बिकट वाटसभोवताली उंच उंचच डोंगर, घनदाट अरण्य, दाट झाडी, सहा ते सात फूट उंच गवत, ओढे -नाले, खाच-खळगे कसेबसे पार करत बीड गावावरून खाणीच्या वाडीकडे जावे लागते. उन्हाळ्यातील पायवाट पावसाळ्यातील उगवलेल्या जंगली झाडाझुडपांमध्ये कधीच दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे झाडाझुडपातून वाट काढत खाणीची वाडी गाठावी लागते. ही वाट काढताना गवतात लपलेले साप, विंचू कधी दंश करतील याचा नेम नाही. जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांच्या हल्ल्याची ही तेवढीच भीती असते. यामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्र मण करावे लागते.>रस्त्याअभावी आमच्या आदिवासीवाडीतील महिलेला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. बीड ते खाणीची वाडी, तसेच स्टेशन-ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर करावा, रस्त्याअभावी मृत्यू होणे ही लाजिरवाणी बाब आहे, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ २६ जानेवारीला आंदोलनात सहभागी होऊ.- अरुण वाघमारे, स्थानिक ग्रामस्थ>पावसाळ्यात तर ओढे-नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे पायवाटेतील ओढे-नाले पार करताना वाहून जाण्याची भीती असते. शाळेतील लहान मुले, गर्भवती महिला यांची तर फारच तारांबळ उडते.- अशोक जंगले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा