शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

मुख्यमंत्र्यांकडून वकिलांनी मागितले रिटर्न गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:29 IST

सामाईक कर्ज योजना देण्याची मागणी : अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : गेल्या काही महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या वकिलांसाठी पाच लाख रुपयांचे कर्ज देणारी सामाईक योजना मंजूर करावी, अशी मागणी अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वसाधरणपणे ज्यांचा वाढदिवस असतो, त्यांना एखादे गिफ्ट दिले जाते, तर त्यांच्याकडून रिटर्न गिफ्ट देण्याची अलीकडची प्रथा आहे. अलिबाग येथील अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशननेही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छांचे गिफ्ट दिले आहे. त्या बदल्यात वकिलांसाठी सामायिक कर्ज योजना मंजूर करण्याची मागणी करून एक प्रकारे रिटर्न गिफ्टच मागितल्याचे दिसून येते.लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्या वकिलांसाठी सरकारने पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणारी सामाईक योजना मंजूर करावी, अशी मागणी अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.या कर्ज रकमेचा परतावा ३६ महिन्यांत करण्याची मुदत द्यावी. कर्जाचा मोरेटोरियम (आपत्कालीन परिस्थितीत वसूल न करण्याचा कालावधी) एक वर्ष मंजूर करावा, अशीही मागणी त्यांनी पत्रात नमूद केली आहे. मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अ‍ॅड.ठाकूर यांनी प्रथम त्यांना महाराष्ट्र-गोवा राज्यातील तमाम वकील वर्गामार्फत वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने गेले पाच महिने सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे.राज्याचे प्रमुख म्हणून आपण अतिशय कार्यक्षमतेने राज्यातील परिस्थिती हाताळत आहात.गेल्या काही महिन्यांमध्ये वकिलांना आपला व्यवसाय करणे शक्य झालेले नाही. महाराष्ट्रातील वकील वर्गालाही या संकटाच्या कालावधीत आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वकील वर्गाला हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे वकिलांच्या सन्मानाने जगण्याच्या आणि काम करण्याच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्यापही वकिलांच्या समस्यांची दखल घेण्यात आलेली नाही, हे खेदजनक आहे, अशी खंत प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केलीआहे.वकिलांना द्यावे लागते आर्थिक समस्यांना तोंडच्न्यायालयातील कामकाज अतितातडीच्या कामाव्यतिरिक्त बंद आहे. पुढील काही महिनेही ते सुरळीत होईल, याची शक्यता कमीच आहे. कामकाजच होत नसल्याने वकील वर्गाला मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वकिलांसह त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या ज्युनिअर वकील अन्य कर्मचारी यांनाही मोठी आर्थिक समस्या जाणवत आहे. याच कारणासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे झाले आहे.च्संकटकाळामध्ये गेले पाच महिने कामकाज बंद असल्याने, वकिलांना सरकारने बँकांना वकिलांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणारी सामाईक योजना राबवून, वकील वर्गास तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.