शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड येथे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान

By admin | Updated: May 8, 2017 06:19 IST

मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरु ड जंजिरा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी कोकणातील माणूस या योजनांचा पुरेसा लाभ घेत नाही, अशी खंत आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली.मुरु ड व अलिबाग तालुका कृषीविभाग व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१७ नियोजन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कृषी अधिकाऱ्यांनी सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.मुरु ड तालुक्यातील मिठागर,खामदे येथील पाणीटंचाईच्या संदर्भात तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. भारत निर्माण योजनेतून ३ वर्षांत १०० कोटींची मागणी असताना जिल्हानियोजन मंडळाने केवळ १० कोटी निधी मिळाल्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. योजनेंतर्गत पुरवणी निधीला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागाने गांभीर्याने शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याचे संकेत दिले. या प्रसंगी व्यासपीठावर आम. सुभाष पाटील, रायगड जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, जि.प. सदस्या नम्रता कासार, मुरुडतालुुका पं.स.उपसभापती प्रणिता पाटील, मोतीराम पाटील, विजय गिदी, मुरु ड गटविकास अधिकारी एस.यू. चव्हाण, अलिबाग गटविकास अधिकारी संदीप प्रधान,तालुकाकृषीअधिकारीबी.आर. जानुगडे, तालुका कृषीअधिकारी श्याम धर्माधिकारी,बाबू नागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी व बी.आर.जुनागडे यांनी अनुक्र मे मुरु ड व अलिबाग तालुक्याची भौगोलिक क्षेत्राची माहिती, लागवड क्षेत्र, सरासरी पर्जन्य आदीचा आढावा घेत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान खरीप २०१७ चा संकल्प पूर्तीसाठी पीक प्रात्याक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, शेतकरी प्रशिक्षण व सहली, भात बियाणे, तसेच रासायनिक खतांची मागणी आदींचे लक्षांक स्पष्ट केले. सभेस रायगड जिल्हापरिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी लागवड क्षेत्र वाढीस लागण्यासाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना शोधून शेती लागवडीसाठी प्रवृत्त केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२०चे स्वप्न पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष वेधले. नियोजन सभा वर्षातून किमान दोन व्हाव्यात, अशा सूचना आधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील प्रधान यांनी केले.तळ्यात जनजागृतीतळा तालुक्यात ‘‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत १५ मे पर्यंत कृषी जनजागृती पंधरवडाचे आयोजन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतील समाविष्ठ गावांत करण्यात आले आहे. कृषि जनजागृती पंधरवडा दरम्यान कृषि विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना भात किंवा प्रक्रिया प्रात्याशिक, भात उगवण क्षमता प्रात्याक्षिक आदींवर मार्गदर्शन करण्यात आले.