शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मुरुड येथे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान

By admin | Updated: May 8, 2017 06:19 IST

मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरु ड जंजिरा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी कोकणातील माणूस या योजनांचा पुरेसा लाभ घेत नाही, अशी खंत आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली.मुरु ड व अलिबाग तालुका कृषीविभाग व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१७ नियोजन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कृषी अधिकाऱ्यांनी सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.मुरु ड तालुक्यातील मिठागर,खामदे येथील पाणीटंचाईच्या संदर्भात तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. भारत निर्माण योजनेतून ३ वर्षांत १०० कोटींची मागणी असताना जिल्हानियोजन मंडळाने केवळ १० कोटी निधी मिळाल्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. योजनेंतर्गत पुरवणी निधीला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागाने गांभीर्याने शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याचे संकेत दिले. या प्रसंगी व्यासपीठावर आम. सुभाष पाटील, रायगड जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, जि.प. सदस्या नम्रता कासार, मुरुडतालुुका पं.स.उपसभापती प्रणिता पाटील, मोतीराम पाटील, विजय गिदी, मुरु ड गटविकास अधिकारी एस.यू. चव्हाण, अलिबाग गटविकास अधिकारी संदीप प्रधान,तालुकाकृषीअधिकारीबी.आर. जानुगडे, तालुका कृषीअधिकारी श्याम धर्माधिकारी,बाबू नागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी व बी.आर.जुनागडे यांनी अनुक्र मे मुरु ड व अलिबाग तालुक्याची भौगोलिक क्षेत्राची माहिती, लागवड क्षेत्र, सरासरी पर्जन्य आदीचा आढावा घेत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान खरीप २०१७ चा संकल्प पूर्तीसाठी पीक प्रात्याक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, शेतकरी प्रशिक्षण व सहली, भात बियाणे, तसेच रासायनिक खतांची मागणी आदींचे लक्षांक स्पष्ट केले. सभेस रायगड जिल्हापरिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी लागवड क्षेत्र वाढीस लागण्यासाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना शोधून शेती लागवडीसाठी प्रवृत्त केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२०चे स्वप्न पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष वेधले. नियोजन सभा वर्षातून किमान दोन व्हाव्यात, अशा सूचना आधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील प्रधान यांनी केले.तळ्यात जनजागृतीतळा तालुक्यात ‘‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत १५ मे पर्यंत कृषी जनजागृती पंधरवडाचे आयोजन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतील समाविष्ठ गावांत करण्यात आले आहे. कृषि जनजागृती पंधरवडा दरम्यान कृषि विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना भात किंवा प्रक्रिया प्रात्याशिक, भात उगवण क्षमता प्रात्याक्षिक आदींवर मार्गदर्शन करण्यात आले.