शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
5
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
6
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
7
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
8
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
9
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
10
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
13
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
14
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
15
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
16
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
17
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
18
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
19
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
20
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!

आदिवासी समाजाचा एल्गार, सरकारवर टीकेचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:22 IST

अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अलिबाग : अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाचा पैसा खाणा-या विजय मल्ल्यांसारख्या भांडवलदारांना पळविणारे मोदी सरकार गरिबाच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे धनदांडग्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे, अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. गुरुवारी जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकार आंदोलन छेडले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले.यावेळी श्रमिक क्र ांती संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, सर्वहारा जनआंदोलन रायगड संलग्न शोषित क्र ांती संघटनेचे पदाधिकारी, रायगड जनहित मंचचे पदाधिकारी, अलिबाग तालुका आदिवासी कातकरी समाज संघटनेचे भगवान नाईक, ठाकूर समाज संघटना कृष्णा पिंगळा आदी उपस्थित होते. महाराष्ट्र हा साखर उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. साखरेचा तुटवडा नसतानाही गरीब कुटुंबांची रेशनकार्डवर मिळणारी साखर ऐन दिवाळीत बंद के ले आहे. गरीब कुटुंबे केरोसीनचा वापर करतात. त्यामुळे रास्त दरात माणसी दोन लिटर केरोसीन देण्यात यावे, अशी मागणी उल्का महाजन यांनी केली.अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबाच्या संख्येवर ही योजना अवलंबून आहे. याशिवाय आधारकार्डची सक्ती व त्याद्वारे सेवा नाकारणे या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन थांबविले आहे, तरीही सरकारने आधारकार्ड सक्ती केली आहे. बायोमेट्रिकची सक्ती करीत रेशन बंद करु न रोख पैसे ट्रान्सफर करण्याचा डाव सरकारने मांडल्याचा आरोप सुरेखा दळवी यांनी केला. राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर केशरी कार्डधारक कुटुंबांपैकी एक कोटी ७७ लाख जनसंख्या रेशन मिळण्यापासून वंचित झाली होती. त्यांना रेशन व्यवस्थेत सामावून घेण्याचे आश्वासन अन्न पुरवठा मंत्री यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत विधिमंडळासमोर दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता झाली नाही. सध्याचे सरकार अन्न सुरक्षा कायद्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.अन्न अधिकार आंदोलनाच्या मागण्यासर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषाप्रमाणे अंत्योदय योजनेची अंमलबजावणी, रेशनवर माणसी अर्धा किलो साखर १५ रु पये दराने देणे, दोन लिटर केरोसीन, रोख पैसे ट्रान्सफर ही योजना रद्द करणे, दोन महिने पोषण आहार न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा भत्ता देण्यात यावा, अंगणवाडीमध्ये आहारासाठी प्रति बालक दिलेली तरतूद वाढविण्यात यावी, टीएचआरबाबतचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Raigadरायगड