शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

आदिवासी समाजाचा एल्गार, सरकारवर टीकेचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:22 IST

अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अलिबाग : अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाचा पैसा खाणा-या विजय मल्ल्यांसारख्या भांडवलदारांना पळविणारे मोदी सरकार गरिबाच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे धनदांडग्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे, अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. गुरुवारी जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकार आंदोलन छेडले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले.यावेळी श्रमिक क्र ांती संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, सर्वहारा जनआंदोलन रायगड संलग्न शोषित क्र ांती संघटनेचे पदाधिकारी, रायगड जनहित मंचचे पदाधिकारी, अलिबाग तालुका आदिवासी कातकरी समाज संघटनेचे भगवान नाईक, ठाकूर समाज संघटना कृष्णा पिंगळा आदी उपस्थित होते. महाराष्ट्र हा साखर उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. साखरेचा तुटवडा नसतानाही गरीब कुटुंबांची रेशनकार्डवर मिळणारी साखर ऐन दिवाळीत बंद के ले आहे. गरीब कुटुंबे केरोसीनचा वापर करतात. त्यामुळे रास्त दरात माणसी दोन लिटर केरोसीन देण्यात यावे, अशी मागणी उल्का महाजन यांनी केली.अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबाच्या संख्येवर ही योजना अवलंबून आहे. याशिवाय आधारकार्डची सक्ती व त्याद्वारे सेवा नाकारणे या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन थांबविले आहे, तरीही सरकारने आधारकार्ड सक्ती केली आहे. बायोमेट्रिकची सक्ती करीत रेशन बंद करु न रोख पैसे ट्रान्सफर करण्याचा डाव सरकारने मांडल्याचा आरोप सुरेखा दळवी यांनी केला. राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर केशरी कार्डधारक कुटुंबांपैकी एक कोटी ७७ लाख जनसंख्या रेशन मिळण्यापासून वंचित झाली होती. त्यांना रेशन व्यवस्थेत सामावून घेण्याचे आश्वासन अन्न पुरवठा मंत्री यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत विधिमंडळासमोर दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता झाली नाही. सध्याचे सरकार अन्न सुरक्षा कायद्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.अन्न अधिकार आंदोलनाच्या मागण्यासर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषाप्रमाणे अंत्योदय योजनेची अंमलबजावणी, रेशनवर माणसी अर्धा किलो साखर १५ रु पये दराने देणे, दोन लिटर केरोसीन, रोख पैसे ट्रान्सफर ही योजना रद्द करणे, दोन महिने पोषण आहार न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा भत्ता देण्यात यावा, अंगणवाडीमध्ये आहारासाठी प्रति बालक दिलेली तरतूद वाढविण्यात यावी, टीएचआरबाबतचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Raigadरायगड