शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अतिक्रमणधारकांना प्रशासनाचे अभय

By admin | Updated: July 26, 2016 04:59 IST

सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही

अलिबाग : सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याची खंत पेण येथील नागरिक दत्तात्रेय मोकल यांनी व्यक्त केली.महसूल प्रशासनाला अधिकृत माहिती असूनही गेल्या वर्षभरात केवळ पंचनामा करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली नाही, अशी व्यथा अलिबाग येथील तुषार विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोकल यांनी मांडली. पेण तालुक्यातील काश्मिरेवाडी गट नं. २/१ वन विभागाची ५.२१ हे.आर. सरकारी मिळकत आहे. या मिळकतीपैकी काही जागेमध्ये पोलीस जमादार विठ्ठल देवजी कोळी यांचा भाऊ आत्माराम देवजी कोळी यांनी बेकायदा बांधकाम सुरु केले आहे. बांधकाम करताना मळेघर ग्रामपंचायतीची कोणतीही बांधकाम परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे दत्तात्रेय मोकल यांनी सांगितले. बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्यासंदर्भात पेणच्या वनक्षेत्रपाल अधिकारी आणि पेण तहसीलदारांकडे २४ एप्रिल २०१५ रोजी लेखी तक्र ार केली होती. गट नं. १/१ ही जागा संरक्षित वने अशी आहे. महसूल खात्याने सरकारी दफ्तरी चुकीची नोंद घेतली आहे. या सरकारी जमिनीवरील अतिक्र मणे दूर करून ही २/१ ही सरकारी मिळकत वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी, असे वनविभागाकडून सांगण्यात आल्याचे दत्तात्रेय मोकल यांनी सांगितले.मंडळ अधिकारी पेण यांनी दिलेल्या माहिती व अहवालानुसार विठ्ठल देवजी कोळी व आत्माराम देवजी कोळी यांनी गट नं. २/१ सरकारी ५.२१ या जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. विठ्ठल देवजी कोळी यांनी सदरचे बांधकाम हे पत्नीच्या नावे असल्याचे मान्य केले. हे बांधकाम बंद करीत असल्याचा जबाब मंडळ अधिकाऱ्यांच्या समक्ष लिहून दिला, असेही मोकल यांनी सांगितले.रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अनधिकृत बांधकामासंदर्भात लेखीतक्र ार केली होती. जिल्हाधिकारी यांनीही काश्मिरेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, असे आदेश पेण तहसीलदारांना दिले होते.नोटीस बजावली- तहसीलदार पेण यांच्याकडून विठ्ठल कोळी व आत्माराम देवजी कोळी यांना बेकायदेशीर बांधकाम तात्काळ दूर करावे अशी नोटीस देण्यात आली. नोटीस बजावून देखील बेकायदा बांधकाम हे सुरु च ठेवले आहे.भूमी अभिलेख विभागाला सदर जागेची मोजणी करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यावर बांधकाम तोडण्याबाबत कारवाई केली जाईल. कायदा मोडणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही.- वंदना मकू, तहसीलदार, पेण