शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
5
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
6
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
7
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
8
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
9
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
10
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
11
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
12
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
13
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
14
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
15
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
16
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
17
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
18
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
20
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

माहिती अधिकाऱ्यांचा पत्ता कट

By admin | Updated: January 1, 2016 23:58 IST

वाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.

- आविष्कार देसाई,  अलिबागवाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. ३५ जिल्ह्यांत साजरा करण्यात येणारा ग्रंथोत्सव हा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांकडून आता काढून घेण्यात आला आहे. वाचनाची चळवळ खेड्यापाड्यात खऱ्या अर्थाने पोचविणाऱ्या जिल्हा ग्रंथालयामार्फतच हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये विविध तारखांना ‘ग्रंथोत्सव १६’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. पालघर जिल्हा हा नव्याने निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथे हा कार्यक्रम होणार नाही. राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव कार्यक्रम घेण्यास सुरुवात झाली. राज्यातील वाचन संस्कृती टिकून राहावी, प्रत्येकाला वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्रंथालय उभारली आहेत. राज्यात सुमारे १२ हजार ५०० च्या आसपास सरकारी ग्रंथालये आहेत. वाचनाची चळवळ, संस्कृती पिढीपर्यंत नेता यावी, यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ग्रंथोत्सव होय. हा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालायामार्फत राबविला जात होता. मात्र सातत्याने ज्यांची नाळ वाचन संस्कृतीशी जोडली गेली आहे. त्या जिल्हा सरकारी ग्रंथालयांना ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे हे वाचनप्रेमींना सातत्याने खटकत होते.याबाबतची वस्तुस्थिती ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ३ डिसेंबर २०१५ रोजी याबाबतचा सरकारी निर्णय सरकारने प्रसिद्ध केला. त्यानुसार आता जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून हा कार्यक्रम काढून घेऊन ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी त्या त्या जिल्हा ग्रंथालयावर देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष राहणार आहेत, तर जिल्हा माहिती अधिकारी हे आता सदस्य असणार आहेत.जिल्हा सरकारी ग्रंथालयामार्फत जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ग्रंथोत्सव पार पडणार आहे. वाचकांना एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच प्रकाशक आणि ग्रंथविक्रेता यांना एकाच ठिकाणी ग्रंथविक्रीसाठी जागा मिळावी, हा उद्देश आहे.-किरण धांडोरे, संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई