शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 03:25 IST

नागरिकांकडून स्वागत : शिस्त लावण्याचा नेरळ ग्रामपंचायतीचा प्रयत्न

नेरळ : शहरात बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे, यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत जरी केले असले, तरी ही कारवाई कायम राहणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नेरळ गावाचे शहरात रूपांतर होत आहे. वाढलेले नागरीकीकरण यामुळे नेरळचे रूपडे पालटत आहे. हे नागरीकीकरण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल २२ कोटी रूपये निधी रस्त्यांसाठी देऊन नेरळच्या विकासात भर घातली. नेरळमधील रस्ते अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या सिमेंट काँक्र ीटचे होत आहेत. त्यापैकी मुख्य बाजारपेठेतला रस्ता झालाही. रस्ता झाल्यानंतर नेरळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण जुना रस्ता अरुं द आणि खड्डेमयी होता. नेरळ शहर हे आजूबाजूच्या २० ते २५ छोट्या-मोठ्या गाव, खेडे, पाडे यांना जोडलेले असल्याने तेथील लोकांचा वावर कायम नेरळमध्ये असल्याने बाजारपेठ गजबजलेली असते. मात्र, नवीन रस्ता झाला आणि त्याला बेशिस्त पार्किंगचा विळखा पडला. या बेशिस्त पार्किंगमुळे पुन्हा एकदा वाहतूककोंडीला सुरुवात झाली. अगदी टॅक्सी स्टँडपासून ते हेटकरआळीपर्यंत हीच परिस्थिती आहे. रस्त्यावर केलेली बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांनी अडवलेले फूटपाथ यामुळे पादचाºयांना चालायलाही जागा उरत नाही. त्यातही ट्रेनचे प्रवासी आल्यावर तर बाजारपेठ हाउसफुल्ल अशी स्थिती निर्माण होते. या बेशिस्त वाहन पार्क करणाºया वाहनचालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच यांनी निर्णय घेत नेरळ पोलिसांच्या मदतीने सोमवारपासून बेशिस्त पार्किंग होत असलेल्या वाहन व वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नेरळची बाजारपेठ मोकळी झाल्याचे चित्र आहे.

या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत जरी करण्यात आले असले, तरी ही कारवाई कायम केली जाणार का? हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. याचे कारणही तसेच आहे. मागील वेळेस अशीच कारवाई दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, दोन्ही वेळेला चार दिवस कारवाई झाली नंतरची परिस्थिती जैसे थेच झाली.

टॅग्स :Raigadरायगड