शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

खूनप्रकरणी आरोपीस दुहेरी जन्मठेप

By admin | Updated: January 3, 2016 03:49 IST

पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी अशा दोघींचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पेण तालुक्यातील वाशी येथील उमेश पाटील याने पत्नी

अलिबाग : पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी अशा दोघींचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पेण तालुक्यातील वाशी येथील उमेश पाटील याने पत्नी शालीनी आणि दीद वर्षांच्या मुलीचा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचे निर्दयी कृत्य केले. त्याप्रकरणी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी शनिवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिला मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा न्यायालयाने दिलेला हा दुहेरी जन्मठेपेचा निकाल जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.पेण तालुक्यातील वाशी या गावातील प्रदीप म्हात्रे यांची मुलगी चैताली हिचा प्रेमविवाह त्याच गावातील उमेश पाटील याच्याबरोबर झाला होता. त्यांना आर्या नावाची मुलगी झाली. चैतालीचा पती उमेश ृकाहीही कामधंदा करीत नसे. तो पत्नी चैतालीस मारहाण करीत असे. गावच्या तंटामुक्त गाव समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांसमोरही उमेशने चैतालीस मारहाण करून तिला व मुलगी आर्या या दोघींनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. पती उमेशबरोबरच चैतालीचे सासूसासरेदेखील चैतालीस त्रास देत असत. उमेशच्या अन्य एका मुलीबरोबरच्या पे्रमप्रकरणावरूनही त्यांच्यात वाद झाला होता.दीड वर्षाची मुलगी आर्या हिला आपल्या आईवडिलांच्या घरी ठेवून चैताली कामावर जात असे. २८ फेब्रुवारी २०१३ ला संध्याकाळी चैताली पेण येथून कामावरून मुलीस घेऊन वाशी येथील जगदंबा वाडी येथे सासरच्या घरी आली. त्या दिवशी रात्री उमेशशी भांडण झाले. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चैताली हिला शोधण्याकरिता व चौकशी करण्याकरिता तिची सासू शालिनी पाटील व सासरे गणेश पाटील हे चैतालीचे वडील प्रदीप म्हात्रे यांच्या घरी आले. त्यांच्यासोबत चैतालीचे वडील प्रदीप म्हात्रे हे चैतालीस शोधायला निघाले. जगदंबा वाडीजवळील एका मोकळ््या जागेत चैताली व तिची मुलगी आर्या यांचे मृतदेह पूर्ण जळालेले दिसले.न्यायालयाने उमेश पाटील यास पत्नी व मुलीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवून प्रत्येक खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि पत्नीचा छळ केल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मृत चैतालीचे सासरे गणेश पाटील व सासू शालिनी पाटील यांना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. मात्र त्यांच्या सुटकेबाबत सरकार पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)