शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

सहा आसनी रिक्षाला अपघात

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेस महाड येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास समुद्रातील ओहोटीमुळे खाडीला पाणी कमी झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिघी येथे मुरु ड लाँचने आलेले प्रवासी बोर्लीपंचतन किंवा अन्य मार्गावर झटपट प्रवासासाठी मिनीडोरमधून प्रवासी वाहतूक सुरू असते. मंगळवारी सायंकाळी प्रवाशांना घेऊन टाटा मॅजिक दिघी जेटीवरून बोर्लीपंचतनकडे येण्यास निघाली. जेटीवरून बोर्ली-श्रीवर्धन मुख्य रस्त्यापर्यंत दिघी खाडीलगत भराव टाकून एक कच्चा रस्ता दोन तीन वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. जेटीचे काम सुरू असल्याने मोठे दगड बाहेर आले असून तोे अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्यानेच वाहनांची वर्दळ असते, ही गाडी जेटीवरून काही मीटर अंतरावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला कठडे नसल्याने ही टाटा मॅजिक १५ ते २० फूट खोल खाडीमध्ये पलटी झाली. त्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये चालक युनुस बोदलाजी, प्रमोद पाटील (३६, रा. नाशिक), आलिया दळवी (रा. दिघी), सईद दळवी.(रा. दिघी) हे जखमी झाले तर सीमा पाटील यांना उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)