शहरं
Join us  
Trending Stories
1
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
3
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
4
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
5
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
6
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
7
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
8
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
9
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
10
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
11
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
12
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
13
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
14
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
15
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
16
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
17
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
18
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
19
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
20
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाकण-खोपोली महामार्गाच्या कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:40 IST

आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती.

- विनोद भोईरपाली : वाकंण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम मागील दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. मात्र, आता पाऊस कमी झाल्याने या मार्गाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. येत्या मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसी प्रशासनाने केले आहे. याबरोबरच या मार्गावर पाली, जांभूळपाडा व भाळगुल येथे महत्त्वाच्या नदीपुलांजवळ नव्याने अधिक क्षमतेचे व मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याची प्राथमिक कामाची सुरुवात आता झाली आहे.आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने ठेकेदाराची खांदापालट करत दुसऱ्याकडे काम सोपविले आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे, दगड गोटे, चिखल व राडारोडा होता. खड्डे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे अनेक अपघातांना आमंत्रणही मिळाले होते.आता या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. त्याचा जो भाग पावसाळ्यात खूप खराब झाला होता त्याचे पॅचवर्क चे काम सुरू झाले आहे. जे काम सुरू झाले नव्हते ते करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी दिली. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या समस्याही काही प्रमाणात सोडविल्या जात आहेत.रुंद पुलामुळे गैरसोय थांबणारपाली व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील पुलाची उंची कमी आहे, त्यामुळे पावसामुळे नदीचे पाणी वाहून दरवर्षी या पुलावरून पाणी जाते. परिणामी, वारंवार येथील वाहतूक ठप्प होते. आता महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच जवळपास ६० ते ७५ टन क्षमता असलेले १६ मीटर रुंद व चार मार्गाचा (लेन) असलेले पूल बनवणार आहेत. त्याचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसी प्रशासनाने दिली.महत्त्वाचा मार्गवाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते. त्यामुळे मुंबई-पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.या राज्य महामार्गाचे काम लवकर व चांगल्या दर्जाचे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन केले आहे. काही समस्या आहेत त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहोत.- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.मार्गावर कामाला सुरुवात झाली आहे. कामाचा वेग पाहता लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होईल. असे झाल्यास प्रवासी व वाहनचालकांची सोय होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अधिक सुरक्षित होईल.- योगेश मोरे, प्रवासी, परळी.

टॅग्स :Raigadरायगड