शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वाकण-खोपोली महामार्गाच्या कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:40 IST

आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती.

- विनोद भोईरपाली : वाकंण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम मागील दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. मात्र, आता पाऊस कमी झाल्याने या मार्गाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. येत्या मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसी प्रशासनाने केले आहे. याबरोबरच या मार्गावर पाली, जांभूळपाडा व भाळगुल येथे महत्त्वाच्या नदीपुलांजवळ नव्याने अधिक क्षमतेचे व मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याची प्राथमिक कामाची सुरुवात आता झाली आहे.आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने ठेकेदाराची खांदापालट करत दुसऱ्याकडे काम सोपविले आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे, दगड गोटे, चिखल व राडारोडा होता. खड्डे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे अनेक अपघातांना आमंत्रणही मिळाले होते.आता या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. त्याचा जो भाग पावसाळ्यात खूप खराब झाला होता त्याचे पॅचवर्क चे काम सुरू झाले आहे. जे काम सुरू झाले नव्हते ते करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी दिली. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या समस्याही काही प्रमाणात सोडविल्या जात आहेत.रुंद पुलामुळे गैरसोय थांबणारपाली व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील पुलाची उंची कमी आहे, त्यामुळे पावसामुळे नदीचे पाणी वाहून दरवर्षी या पुलावरून पाणी जाते. परिणामी, वारंवार येथील वाहतूक ठप्प होते. आता महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच जवळपास ६० ते ७५ टन क्षमता असलेले १६ मीटर रुंद व चार मार्गाचा (लेन) असलेले पूल बनवणार आहेत. त्याचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसी प्रशासनाने दिली.महत्त्वाचा मार्गवाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते. त्यामुळे मुंबई-पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.या राज्य महामार्गाचे काम लवकर व चांगल्या दर्जाचे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन केले आहे. काही समस्या आहेत त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहोत.- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.मार्गावर कामाला सुरुवात झाली आहे. कामाचा वेग पाहता लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होईल. असे झाल्यास प्रवासी व वाहनचालकांची सोय होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अधिक सुरक्षित होईल.- योगेश मोरे, प्रवासी, परळी.

टॅग्स :Raigadरायगड