शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दिघी बंदराच्या विकासाला गती; अदानी कंपनीकडे हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:11 IST

बंदरासाठी घेतली १६०० एकर जमीन

गणेश चोडणेकरआगरदांडा : दिवाळखोरीत गेलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टच्या हस्तांतरण प्रक्रियेल आता वेग आला आहे. सुमारे २७०० कोटी रुपयांचे कर्ज दिघी पोर्ट लिमिटेडवर असल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे होते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या जेएनपीटीने हे बंदर ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अचानक कंपनीने माघार घेतली असून आता गौतम अदानी यांच्या कंपनीने हे बंदर घेण्याची तयारी दर्शविल्याने बंदराच्या विकासाला वेग येण्याची शक्यता आहे.

दिघी बंदराचा विकास बालाजी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. आणि आयएल अ‍ॅण्ड एफएस लि. या दोन कंपन्या संयुक्तपणे विकसित करीत आहेत. बंदरासाठी १६०० एकर जमीन घेण्यात आलेली आहे. राजपुरी खाडीतील बंदराचा विकास, त्यानंतर कारभार चालविण्यासाठी ५० वर्षांची सवलत सरकारने दिलेली आहे. बंदर फ्रेट कॉरिडोरचाही भाग असून ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी बंदर विभागाचे प्रयत्न आहेत. दरम्यान, बँकेचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार अशा अनेक कारणांमुळे दिघी बंदराचा विकास रखडला आहे. या कामाला वेग आला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. स्थानिक विद्यार्थ्यांनी बंदरातील कामाशी संबंधित प्रक्षिक्षण घेतल्यास त्यांना सहज नोकºया उपलब्ध होऊ शकतात. दिघी बंदराचा विकास होऊन स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या १० ते १२ वर्षांपासून बंदराचा विकास होत असून मोठी जहाजे मात्र तुरळकच येत आहेत. दिघी येथील बंदर भागाचा विकास झाला आहे. परंतु आगरदांडा येथील भाग विकसित होणे बाकी आहे. दिघी बंदर अदानी यांनी घेतले तर आगरदांडा येथे रखडलेल्या कामाला वेग येऊ शकतो.आगरदांडा येथील काम सध्या ठप्प आहे. आगरदांडा येथे माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जहाजे थांबण्यासाठी नवीन जेट्टी विकसित करणे, वाहनतळ, प्लॅटफॉर्म, कंपनी कार्यालय इत्यादी कामे रखडली आहेत. त्यामुळे स्थानिकांना मिळणारा रोजगार ठप्प झाला आहे.