शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दिघी बंदराच्या विकासाला गती; अदानी कंपनीकडे हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:11 IST

बंदरासाठी घेतली १६०० एकर जमीन

गणेश चोडणेकरआगरदांडा : दिवाळखोरीत गेलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टच्या हस्तांतरण प्रक्रियेल आता वेग आला आहे. सुमारे २७०० कोटी रुपयांचे कर्ज दिघी पोर्ट लिमिटेडवर असल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे होते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या जेएनपीटीने हे बंदर ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अचानक कंपनीने माघार घेतली असून आता गौतम अदानी यांच्या कंपनीने हे बंदर घेण्याची तयारी दर्शविल्याने बंदराच्या विकासाला वेग येण्याची शक्यता आहे.

दिघी बंदराचा विकास बालाजी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. आणि आयएल अ‍ॅण्ड एफएस लि. या दोन कंपन्या संयुक्तपणे विकसित करीत आहेत. बंदरासाठी १६०० एकर जमीन घेण्यात आलेली आहे. राजपुरी खाडीतील बंदराचा विकास, त्यानंतर कारभार चालविण्यासाठी ५० वर्षांची सवलत सरकारने दिलेली आहे. बंदर फ्रेट कॉरिडोरचाही भाग असून ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी बंदर विभागाचे प्रयत्न आहेत. दरम्यान, बँकेचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार अशा अनेक कारणांमुळे दिघी बंदराचा विकास रखडला आहे. या कामाला वेग आला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. स्थानिक विद्यार्थ्यांनी बंदरातील कामाशी संबंधित प्रक्षिक्षण घेतल्यास त्यांना सहज नोकºया उपलब्ध होऊ शकतात. दिघी बंदराचा विकास होऊन स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या १० ते १२ वर्षांपासून बंदराचा विकास होत असून मोठी जहाजे मात्र तुरळकच येत आहेत. दिघी येथील बंदर भागाचा विकास झाला आहे. परंतु आगरदांडा येथील भाग विकसित होणे बाकी आहे. दिघी बंदर अदानी यांनी घेतले तर आगरदांडा येथे रखडलेल्या कामाला वेग येऊ शकतो.आगरदांडा येथील काम सध्या ठप्प आहे. आगरदांडा येथे माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जहाजे थांबण्यासाठी नवीन जेट्टी विकसित करणे, वाहनतळ, प्लॅटफॉर्म, कंपनी कार्यालय इत्यादी कामे रखडली आहेत. त्यामुळे स्थानिकांना मिळणारा रोजगार ठप्प झाला आहे.