शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:06 IST

पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

कळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठाकळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :Raigadरायगड