शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:06 IST

पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

कळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठाकळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :Raigadरायगड