शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:06 IST

पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

कळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठाकळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :Raigadरायगड