शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

समस्यांबाबत ४० गावांचा एल्गार

By admin | Updated: December 14, 2015 01:26 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. याकरिता नडगाव गावात झालेल्या एका सभेत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विभागातील प्रदूषण, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वामणे रेल्वे स्थानक आदी समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जवळपास ४० गावांचा समावेश आहे. दादली, वराठी, सव, गोमेंडी, जुई, तुडील, चिंभावे, नरवण, खुटील, रावढळ, आंबीवली आदी गावांचा समावेश आहे. या विभागात असलेल्या समस्यांबाबत या परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे विविध राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. मात्र आता राजकारण विरहित लढा देण्याकरिता या विभागातील ४० गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या परिसरात महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी ओवळे येथे सोडले जात असल्याने खाडी प्रदूषित होते. या विभागातून रेल्वे जावून देखील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. गावातील जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी समस्यांबाबत रविवारी नडगाव गावात ४० गावातील ग्रामस्थ एक झाले. नडगाव गावात झालेल्या बैठकीला ४० गावातील जवळपास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी इनामतखान देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव घाणेकर, सचिवपदी वसंत भडवळकर यांची निवड करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असे इनायत खान देशमुख यांनी सांगितले.