शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

समस्यांबाबत ४० गावांचा एल्गार

By admin | Updated: December 14, 2015 01:26 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. याकरिता नडगाव गावात झालेल्या एका सभेत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विभागातील प्रदूषण, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वामणे रेल्वे स्थानक आदी समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जवळपास ४० गावांचा समावेश आहे. दादली, वराठी, सव, गोमेंडी, जुई, तुडील, चिंभावे, नरवण, खुटील, रावढळ, आंबीवली आदी गावांचा समावेश आहे. या विभागात असलेल्या समस्यांबाबत या परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे विविध राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. मात्र आता राजकारण विरहित लढा देण्याकरिता या विभागातील ४० गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या परिसरात महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी ओवळे येथे सोडले जात असल्याने खाडी प्रदूषित होते. या विभागातून रेल्वे जावून देखील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. गावातील जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी समस्यांबाबत रविवारी नडगाव गावात ४० गावातील ग्रामस्थ एक झाले. नडगाव गावात झालेल्या बैठकीला ४० गावातील जवळपास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी इनामतखान देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव घाणेकर, सचिवपदी वसंत भडवळकर यांची निवड करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असे इनायत खान देशमुख यांनी सांगितले.