शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:13 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांत आरोपी गजाआड

कर्जत : तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी रात्री अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. उल्हास नदीमध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.गणेश अनंता घारे (३५) हा आपल्या मित्रांसह २० फेब्रुवारी रोजी रात्री सांगवी येथील उल्हासनदीमध्ये गप्पा मारत बसले होते. अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गणेश गप्पा मारत असताना रात्री अकराच्या दरम्यान नदीलगतच्या रस्त्यावर चार-पाच पांढऱ्या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले तिघेही पळू लागले. या वेळी अज्ञातांनी एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश यांना पकडले आणि गाडीमध्ये टाकून कर्जतच्या दिशेने निघून गेले.गणेश यांच्याबरोबर असलेल्या तरुणाने घडलेली घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर अपहृत गणेश बंधू योगेश यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे तक्रार केली. याचदरम्यान एक फोन आला आणि तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जतचे पोलीस नेरळ येथे पोहोचले. पोलीस निरीक्षक भोर, पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहोचले.तेथे अपहरण करून आणलेल्या गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणाºया अन्य पाच जणांना ताब्यात घेतले.फिल्मी स्टाइलने करण्यात आलेल्या अपहरण प्रकरणी नोंद करण्यात आली. याप्रकरणी राजू बबन मोरे (३९), भूषण विक्रमसिंग राजपूत (२४), नीलेश बुधाजी मोरे(२७), शाहीद आलिम शेख (२३), लखन अशोक गायकवाड (२४), बाळाजी बबन पोल्ले (२९) यांना अटक केली आहे. सर्वांना कर्जत न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.