शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:13 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांत आरोपी गजाआड

कर्जत : तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी रात्री अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. उल्हास नदीमध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.गणेश अनंता घारे (३५) हा आपल्या मित्रांसह २० फेब्रुवारी रोजी रात्री सांगवी येथील उल्हासनदीमध्ये गप्पा मारत बसले होते. अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गणेश गप्पा मारत असताना रात्री अकराच्या दरम्यान नदीलगतच्या रस्त्यावर चार-पाच पांढऱ्या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले तिघेही पळू लागले. या वेळी अज्ञातांनी एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश यांना पकडले आणि गाडीमध्ये टाकून कर्जतच्या दिशेने निघून गेले.गणेश यांच्याबरोबर असलेल्या तरुणाने घडलेली घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर अपहृत गणेश बंधू योगेश यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे तक्रार केली. याचदरम्यान एक फोन आला आणि तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जतचे पोलीस नेरळ येथे पोहोचले. पोलीस निरीक्षक भोर, पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहोचले.तेथे अपहरण करून आणलेल्या गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणाºया अन्य पाच जणांना ताब्यात घेतले.फिल्मी स्टाइलने करण्यात आलेल्या अपहरण प्रकरणी नोंद करण्यात आली. याप्रकरणी राजू बबन मोरे (३९), भूषण विक्रमसिंग राजपूत (२४), नीलेश बुधाजी मोरे(२७), शाहीद आलिम शेख (२३), लखन अशोक गायकवाड (२४), बाळाजी बबन पोल्ले (२९) यांना अटक केली आहे. सर्वांना कर्जत न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.