शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

थेट सरपंचपदासाठी 'मनी ॲन्ड मसल' पॉवरचा आधार

By निखिल म्हात्रे | Updated: November 2, 2023 13:00 IST

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग - ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार आता संपला असुन सदस्य पदासाठी इलेक्टिव्ह मेरिट असले तरी सरपंच पदासाठी मात्र मनी ॲन्ड मसल' हाच निकष लावला जात असल्याने विकासाची दृष्टी असणारी माणसं या प्रक्रियेत येणार का?, हा खरा प्रश्न आहे.

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करुन खरे तर गावचे रुपडे पालटण्याची दृष्टी असणारी माणसं निवडून जाणं अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निवडणुकांचे स्वरुप व पैशांचा वापर पाहता अनेक ठिकाणी प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढवल्या जातात.चांगला उमेदवार निवडणे महत्त्वाचे -राजकारणात इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व असले तरी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर प्रभागातील समस्यांसाठी किती वेळ देईल, हेही मतदारांनी पाहणे अपेक्षित आहे. त्यात थेट सरपंच निवडीने सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. सरपंचावर सदस्यांचा दबावच राहत नाही, त्यामुळे सरपंच सांगेल त्याप्रमाणेच निधीचे वाटप होते, परिणामी विकासाचा समतोल राहत नसल्याचे गेल्या पाच-सात वर्षात निदर्शनास आले आहे. यासाठी सरपंच पदावर तशी दृष्टी असणारी व्यक्ती निवडून जाणे गरजेचे आहे. मात्र अलीकडे ही दृष्टी मागे पडत चालली असून मनी, मसल पॉवर हाच निकष सगळीकडे लावला जात आहे.आपल्यातील परके कोण ? समजणारी निवडणूक आपल्यातील परके कोण व परक्यातील आपलं कोण?, हे समजायचे झाले तर ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागते. बहुतांश ठिकाणी जवळचेच लोक टांग मारत असल्याने या लोकांकडे अधिक लक्ष ठेवावे लागते.आणाभाका सुरु....सहकारी संस्थांची अथवा ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, आणाभाका आल्याच. त्यातही ग्रामपंचायतीची निवडणूक दहा-वीस मतांवर असल्याने आणाभाका जोरात असतात. गावातील सामाजिक प्रश्नाची चांगली जाण असणारे अनेक तरुण ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते रिंगणाबाहेरच राहीले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत