शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

थेट सरपंचपदासाठी 'मनी ॲन्ड मसल' पॉवरचा आधार

By निखिल म्हात्रे | Updated: November 2, 2023 13:00 IST

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग - ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार आता संपला असुन सदस्य पदासाठी इलेक्टिव्ह मेरिट असले तरी सरपंच पदासाठी मात्र मनी ॲन्ड मसल' हाच निकष लावला जात असल्याने विकासाची दृष्टी असणारी माणसं या प्रक्रियेत येणार का?, हा खरा प्रश्न आहे.

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करुन खरे तर गावचे रुपडे पालटण्याची दृष्टी असणारी माणसं निवडून जाणं अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निवडणुकांचे स्वरुप व पैशांचा वापर पाहता अनेक ठिकाणी प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढवल्या जातात.चांगला उमेदवार निवडणे महत्त्वाचे -राजकारणात इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व असले तरी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर प्रभागातील समस्यांसाठी किती वेळ देईल, हेही मतदारांनी पाहणे अपेक्षित आहे. त्यात थेट सरपंच निवडीने सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. सरपंचावर सदस्यांचा दबावच राहत नाही, त्यामुळे सरपंच सांगेल त्याप्रमाणेच निधीचे वाटप होते, परिणामी विकासाचा समतोल राहत नसल्याचे गेल्या पाच-सात वर्षात निदर्शनास आले आहे. यासाठी सरपंच पदावर तशी दृष्टी असणारी व्यक्ती निवडून जाणे गरजेचे आहे. मात्र अलीकडे ही दृष्टी मागे पडत चालली असून मनी, मसल पॉवर हाच निकष सगळीकडे लावला जात आहे.आपल्यातील परके कोण ? समजणारी निवडणूक आपल्यातील परके कोण व परक्यातील आपलं कोण?, हे समजायचे झाले तर ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागते. बहुतांश ठिकाणी जवळचेच लोक टांग मारत असल्याने या लोकांकडे अधिक लक्ष ठेवावे लागते.आणाभाका सुरु....सहकारी संस्थांची अथवा ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, आणाभाका आल्याच. त्यातही ग्रामपंचायतीची निवडणूक दहा-वीस मतांवर असल्याने आणाभाका जोरात असतात. गावातील सामाजिक प्रश्नाची चांगली जाण असणारे अनेक तरुण ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते रिंगणाबाहेरच राहीले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत