शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

कोरोनासाठी ९० कोटींची गरज, उपाययोजनांसाठी लागणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:32 IST

मदतीकडे लक्ष : जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव; उपाययोजनांसाठी लागणार निधी

आविष्कार देसाई।रायगड :कोरोना निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत १४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. मात्र, अद्यापही कोरोनासोबतची लढाई लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ९० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे सरकार किती मदतीचा हात देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

८ मार्च, २०२० रोजी रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले होते. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. याच कालावधीत देशाच्या फाळणीनंतरचे सर्वात जास्त संख्येन नागरिकांचे स्थलांतर झाले होते. पायी प्रवास करणाऱ्यांना काही स्थलांतरित मजुरांना जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्गाला काही कालावधीसाठी बºयापैकी चेक बसला होता. मात्र, लॉकडाऊन करून अर्थव्यवस्थेची बिघडलेली घडी अधिक विस्कटत असल्याने, सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम रुग्णवाढीवर झाला आहे. कोरोनावर अद्यापही प्रभावी लस विकसित करण्यास कोणत्याच राष्ट्राला अपेक्षित यश आलेले नाही. कोरोनासोबतच जीवन जगण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला. त्यामुळे नोकरी, काम-धंद्यासाठी नागरिकांना नाइलाजास्तव घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही गडद आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजना, तसेच सोईसुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आर्थिक हात बळकट होणे गरजेचे असल्याने मार्च, २०२० पासून आतापर्यंत १४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून स्थलांतरित होणाºया प्रवाशांची प्रवासी व्यवस्था करणे, शिबिरे घेणे, रेल्वेचे भाडे, बस प्रवास भाडे अन्न, रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका यांच्या निवासाची व्यवस्था, सॅनिटायझर्स, थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर, कोविड केअर सेंटर, कोविड आयसीआय आदींच्या खर्चाचा त्यामध्ये समावेश होता. त्यातील सुमारे आठ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. रायगड जिल्ह्याच्या पदरात सरकार किती झुकते माप टाकते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.प्रशासनाने खर्च केलेल्या निधीचा तपशील जाहीर करावाच्जिल्हा प्रशासन कोरोनाशी लढण्यासाठी निधीची मागणी करत आहे. यात गैर काहीच नाही. मात्र, आतापर्यंत खर्च केलेल्या निधीचा तपशील त्यांनी जनतेसाठी जाहीर करणे हे तितकेच संयुक्तिक ठरणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.च्जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र, मोघम उत्तर मिळत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जनतेच्या खिशातील पैशावर कोरोनाशी युद्ध लढले जात आहे. त्यामुळे जनतेचा पैसा नक्की कोणकोणत्या संसाधनांवर खर्च होतोे.च्हे जाणण्याचा प्रत्येक नागरिकांना हक्क आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनासोबतची लढाई लढता-लढता प्रशासनाला जनतेला तोंड देणे मुश्कील होणार असल्याचे दिसून येते.प्रशासनाला आर्थिक रसद कमी पडत आहे : कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाचे सावट किती दिवस, किती महिने अथवा किती वर्षे राहणार आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. कोरोनाची लढाई लढताना, त्यासाठी विविध उपाययोजना करताना प्रशासनाला आर्थिक रसद कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करताना, जिल्हा प्रशासनाला अद्यापही तब्बल ९० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबतची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सतिश कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोना निर्मूलनासाठी आतापर्यंत १४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. विविध कारणांसाठी तो खर्च झाला आहे. अद्यापही प्रशासनाला निधीची आवश्यकता आहे. सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या