शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

९०९ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 6, 2016 01:20 IST

संच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने

- आविष्कार देसाई,  अलिबागसंच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत मिळणार आहे, परंतु उर्दू माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षकांनी यावेळी निरुत्साह दाखविल्याने त्यांची मात्र वानवा जाणवणार आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात गुरुवारी पदवीधर शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात झाली. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने वशिलेबाजीला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे हुशाार आणि क्वालिफाईड शिक्षक या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार ५०० शिक्षक आहेत. पैकी चार हजार शिक्षक हे पदवीधर आहेत. एक हजार ३८३ पदे मंजूर आहेत, तर ३५७ पदे कार्यरत आहेत. ९०९ पदे रिक्त होती. मार्च महिन्यात सरकारकडून रायगड जिल्ह्याला संच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयनिहाय भरती केली जात आहे. ४ मे रोजी २३७ पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर ५ मे रोजी सुमारे २०० पदवीधर शिक्षकांची वर्णी लागली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पदोन्नतीने चांगले शिक्षक विविध शाळांना मिळणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच वाव असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्दू माध्यमातून शिक्षण देण्यासाठी एकूण ८८ शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु फक्त पाचच शिक्षकांनी येथे हजेरी लावली होती.