- आविष्कार देसाई, अलिबागसंच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत मिळणार आहे, परंतु उर्दू माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षकांनी यावेळी निरुत्साह दाखविल्याने त्यांची मात्र वानवा जाणवणार आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात गुरुवारी पदवीधर शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात झाली. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने वशिलेबाजीला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे हुशाार आणि क्वालिफाईड शिक्षक या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार ५०० शिक्षक आहेत. पैकी चार हजार शिक्षक हे पदवीधर आहेत. एक हजार ३८३ पदे मंजूर आहेत, तर ३५७ पदे कार्यरत आहेत. ९०९ पदे रिक्त होती. मार्च महिन्यात सरकारकडून रायगड जिल्ह्याला संच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयनिहाय भरती केली जात आहे. ४ मे रोजी २३७ पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर ५ मे रोजी सुमारे २०० पदवीधर शिक्षकांची वर्णी लागली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पदोन्नतीने चांगले शिक्षक विविध शाळांना मिळणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच वाव असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्दू माध्यमातून शिक्षण देण्यासाठी एकूण ८८ शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु फक्त पाचच शिक्षकांनी येथे हजेरी लावली होती.
९०९ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
By admin | Updated: May 6, 2016 01:20 IST