शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जिल्ह्यातून तीन वर्षांत ८७ बालकामगारांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:52 IST

बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे बालमन कोमेजून टाकणाऱ्यांच्या विरोधात सहायक आयुक्त कामगार यांनी, गेल्या तीन वर्षांत धाडी टाकून ८७ बालकामगारांची सुटका केली आहे. नवीन वर्षात रायगड जिल्ह्यातील बालकामगार कृतिदल अधिक आक्रमकपणे मोहीम राबणार असल्याने बालकामगारांना कामावर ठेवणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग - बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे बालमन कोमेजून टाकणाऱ्यांच्या विरोधात सहायक आयुक्त कामगार यांनी, गेल्या तीन वर्षांत धाडी टाकून ८७ बालकामगारांची सुटका केली आहे. नवीन वर्षात रायगड जिल्ह्यातील बालकामगार कृतिदल अधिक आक्रमकपणे मोहीम राबणार असल्याने बालकामगारांना कामावर ठेवणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्हा हा विकासाचा जिल्हा आहे. येथे मोठ्या संख्येने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प येऊ घातले आहेत. काही प्रकल्पांनी तर प्राथमिक कामाला प्रारंभही केला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आधीपासूनच तळोजा, रोहे, महाड, रसायनी येथे एमआयडीसीअंतर्गत प्रकल्प सुरू आहेत.जिल्ह्यातील शहरीकरणाबरोबरच नागरीकरणाचा आलेख वेगाने वर चढत आहे. त्या अनुषंगाने त्यांना पूरक असणाºया व्यवसायांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे-मोठे हॉटेल, किराणा मालाची दुकाने, गॅरेज, टायर पंचरची दुकाने, बांधकाम व्यवसाय अशा व्यवसायांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवले जाते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने कुटुंबाच्या संसाराला आधार म्हणून काही पालक आपल्या लहान मुलांना कामावर पाठवतात. तेथील आस्थापनांचे मालक त्या लहान मुलांकडून काम करून घेताना त्यांची पिळवणूक करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने त्यांना शिक्षणही घेता येत नाही.बालकामगार कामावर ठेवण्याची अनिष्ट प्रथा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखला. या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सरकारने २५ एप्रिल २००६ रोजी सरकारी निर्णय पारीत केला. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर जिल्हा बालकामगार कृतिदल स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. त्यामार्फत मोठ्या संख्येने बालकामगारांची सुटका करण्यात कृतिदलाला यश आले आहे.जिल्हाभर धाडसत्ररायगड जिल्हा कृतिदलामार्फत डिसेंबर २०१६ अखेर ८६ धाडसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सात हजार ७५० आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ८४ बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. २०१७मध्ये १५ ठिकाणी कृतिदलाने धाडी टाकून, तीन बालकामगांराची सुटका केली. सुटका केलेले बालकामगार हे कॅटरिंग, हॉटेल आणि टायरच्या दुकानात काम करीत असल्याचे आढळून आले होते, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी नीलेश देठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कठोर पावले उचलली जाणार२०१८ सालामध्ये गेल्या तीन महिन्यांत एकही धाडसत्र कृतिदलाने राबवलेले नसले तरी पुढील कालावधीत कृतिदल अधिक आक्रमक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.त्यामुळे या वर्षात कालबद्ध कार्यक्रम आखून जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवणाºयांविरोधात कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचेही, देठे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यातील बालकामगार ठेवण्याच्या अनिष्ट प्रथेचा बिमोड करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बालकामगार ठेवणाºयांना जिल्हा बालकामगार कृतिदलाचा सामना करावा लागणार एवढे मात्र निश्चितच आहे.

टॅग्स :newsबातम्याRaigadरायगड