शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:44 IST

२५ दिवसांनंतर यश : जिल्हा रु ग्णालयातून सुखरूप घरी परत

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : इच्छाशक्ती दांडगी असली, तर अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते, याचा अनुभव अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आला आहे. कोरोना झालेल्या ८३ वर्षीय आजीची तब्येत अत्यावस्थ होती. मात्र, असे असतानाही २५ दिवसांनंतर कोरोनावर मात केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रहिवासी असून, शुक्रवारी जिल्हा रु ग्णालयातून त्या सुखरूप घरी परत गेल्या आहेत.

श्रीवर्धन शहरातील ८३ वर्षीय महिलेवर महाड येथील रु ग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी रुग्णालयात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर, त्यांना ५ जुलै रोजी अलिबाग येथे जिल्हा सामान्यरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोवृद्ध असल्याने त्यांच्या शरीरातील आॅक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नातेवाइकांनीही त्यांची आशा सोडू देत डॉक्टरांनाही तुमच्या परीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र, या परिस्थितीतही जिल्हा सामान्यरुग्णालयाचे डॉ.राजीव तांबाळे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, डॉ.अपूर्वा पाटील यांनी आजीला कोरोनामुक्त करण्यासाठी २५ दिवस अहोरात्र प्रयत्न केले ते सफल झाले. डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार, तर दुसरीकडे आजीची जगण्याची तीव्र इच्छा, यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर त्यांनी मात केली.दरम्यान, त्यांचे पतींचे त्या उपचार घेत असताना दुर्धर आजाराने निधन झाले. मात्र, ही माहिती त्या आजींपासून लपवून ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्यरुग्णालयातून आज या आजींना घरी सोडण्यात आले.चढ्या भावाने विक्री केल्यास कारवाई :जिल्हा शल्यचिकित्सकडॉ.सुहास माने, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, डॉ.राजीव तांबाळे, डॉ.अपूर्वा पाटील, मेट्रेन मोरे आरोग्य सेवक, सेविका यांनीही आजींना गुलाबपुष्प देऊन निरोप दिला. या ८३ वर्षीय आजीचा आदर्श कोरोनाबाधितांनी घेतला पाहिजे.