शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नेरळ परिसरात रस्त्यांसाठी आठ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:48 IST

नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे.

- कांता हाबळेनेरळ : नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. त्याचवेळी कशेळे खांडस आणि नांदगाव फाटा-गणपती घाट या दोन टप्प्यांत रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण ही कामे करण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या राज्य मार्गाचे भूमिपूजन शुक्रवारी कशेळे येथे आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.नेरळ - कशेळे - कोटिंबे-भीमाशंकर या राज्यमार्गावरील नेरळ ते कशेळे या प्रमुख जिल्हा मार्गासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर दुसरा टप्पा कशेळे-कोटिंबे फाटा भीमाशंकर मार्गासाठी १ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचा ठेका मे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन वाशी यांना देण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांवरील असलेले चढ आणि उतारामध्ये सुधारणा करणे, आणि रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे.भूमिपूजनाच्या अगोदरच कामाला सुरुवात करण्यात आली असून नेरळ-कशेळे मार्गावर चढ-उतार यामध्ये सुधारणा करण्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली आहे. हे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले तर यामुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लागणाऱ्या वेळेची बचत होईल आणि कमी वेळात १२ किमीचे अंतर पार करता येणार आहे. ठेकेदाराला कामासाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.नेरळ-कशेळे, भीमाशंकर मार्गासाठी ४ कोटी ९० लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत. निधी मंजूर होऊनही चांगल्या दर्जाचे रस्ते होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकारी यांनी रस्त्यावर उभे राहून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे लागणार आहे. जनतेने आणि वाहनचालकांनी डांबरीकरण सुरू असताना थांबून सहकार्य करणे गरजेचे आहे. यात दर्जेदार कामाची निर्मिती होईल.- सुरेश लाड, आमदारनेरळ-कशेळे-कोटिंबे फाट्यापर्यंत संपूर्ण रस्त्यासाठी ४ कोटी ९० लाख रु पये मंजूर झाले आहेत. कामाची निविदा पूर्ण झाली असून ठेका देण्यात आला आहे. या रस्त्यावरील चढ-उतार काढून डांबरीकरण करण्यात येणार आहे. या १२ किलोमीटर रस्त्यावर चढ-उतारामुळे जो वेळ लागत होता, त्या वेळेची बचत होणार असून एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.- गोरक्ष गवळी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत

 

टॅग्स :Raigadरायगड