शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मागील १० महिन्यांपासून मानधन बंद, रायगड जिल्ह्यातील ७८५ वृध्द लोककलावंतांवर उपासमारीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 22:14 IST

Raigad News: रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

राज्याभरातील हजारो लोक कलावंत तमाशा, नाटक , भारुड, लावणी ,किर्तन, शाहिरी पोवाडे ,पोतदार अशा  सर्व लोककला मोठ्या खुबीने आणि उत्तम प्रकारे सादर करतात. त्या-त्या प्रसंगाचे आणि वेळेचे औचित्य कलेत साठविलेले असते. या सार्‍या लोककला सादर करून नुसतेच मनोरंजन केले जात नाही तर त्यात समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत.या लोककलेतुन समाजाचे प्रबोधनही केले जाते. समाजातील चांगल्या चालीरीती, रितीरिवाज यांची भलावणच  केलेली असते. त्या लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत .एकंदरीत मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककलांना फार महत्त्व आहे.जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अशा लोककलावंत व त्यांच्या वारसांना शासनाकडून दरमहा २२५० रुपये मानधन दिले जाते. 

जिल्हापरिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मानधन लोककलावंत व त्यांच्या वारसांच्या बॅक खात्यांमध्ये थेट जमा केले जाते. मात्र रायगड जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व त्यांच्या वारसांना मागील १० महिन्यांपासून मानधनच मिळणे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वृद्ध लोककलावंतांची संख्या सुमारे ७८५ आसपास आहे. जानेवारी २०२२ पासून वृध्द कलावंतांना देण्यात येणारे मानधन शासनाकडून देण्यात आलेले नाही.मात्र शासनाकडून मानधनाची रक्कम प्राप्त होताच वृध्द कलावंतांना थेट त्यांच्या खात्यावर पाठविण्यात येईल अशी माहिती रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी तात्यासाहेब नारुटे यांनी दिली.

उरणमध्ये १९ वृध्द कलावंत असुन त्यापैकी ६ जण मृत्यू पावले आहेत.मात्र त्यांच्या वारसांनाही मानधन दिले जाते.मात्र जानेवारीपासून त्यांना मानधन मिळाले नसल्याची माहिती उरण पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकारी शैलेश म्हात्रे यांनी दिली.

मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने आर्थिक ओढाताण होत आहे.त्यामुळे वृध्द कलावंतांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येऊन ठेपली असुन उपासमारीची पाळी आली आहे.प्रत्येक महिन्याला मानधन मिळाले तर अशी आर्थिक ओढाताण होणार नसल्याची खंत उरण तालुक्यातील तमाशा कलावंत कै. पांडुरंग म्हात्रे यांच्या वृध्द वारसदार पत्नी हिराबाई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड