शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सांबरकुंड प्रकल्पासाठी ७४२ कोटींची मान्यता; जेएसडब्ल्यूला पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:08 IST

अलिबागमधील ३३ गावांतील अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

आविष्कार देसाई 

अलिबाग : गेल्या ३८ वर्षांपासून रखडलेल्या सांबरकुंड धरण प्रकल्पास मंत्रिमंडळाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. तब्बल ७४२ कोटी ८८ लाख रुपये आता मातीचे धरण बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या धरणामुळे परिसरातील ३३ गावांमधील दोन हजार ५२८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यातील गंभीर बाब म्हणजे जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या प्रकल्पाला यातील काही टक्के पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. त्याला विरोध होत असल्याने कंपनीला पाणी देण्यावरून नजीकच्या कालावधीमध्ये जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज-महान परिसरातील गावांना पाण्याचा प्रश्न सतावत होता, तसेच शेतीसाठीही पाण्याची गरज होती. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पाणी अडवण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने सर्वच पाणी समुद्राला अथवा खाडीला जाऊन आजही मिळत आहे. नागिरकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महान परिसरामध्ये धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली होती. शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी याबाबत प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्यक्षात धरणासाठी एक वीटही उभारता आली नव्हती. त्यानंतर २८ सप्टेंबर १९८२ साली धरण बांधण्यासाठी ११ कोटी ७१ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती; परंतु त्यानंतरही धरण उभारण्यासाठी एक दगडही लावण्यात कोणत्यात राजकीय पक्षाला अथवा सरकारला यश आले नाही. आता या धरणाचा खर्च ४१७ कोटी रुपयांनी वाढला असल्याचे दिसून येते.

८० च्या दशकामध्ये असणारी लोकसंख्या, त्यांना असणारी पाण्याची गरज आणि आताची लोकसंख्या त्यांची गरज यामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे. ३८ वर्षे रखडलेल्या धरणाच्या कामाला गती देण्याचे काम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केले आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांबरकुंड धरणासाठी तब्बल ७४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अलिबाग तालुक्यातील ३३ गावांमधील २,५२८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. यामुळे परिसरातील खालावलेली भूजल पातळी, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. सांबरकुंड धरणामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच बारमाही शेती, बागायती, लघु-उद्योग यांच्यासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हे धरण होणे गरजेचे आहे.वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू - अ‍ॅड. राके श पाटीलसरकारने पाण्याच्या आरक्षणाबाबत अजून स्पष्टता करणे गरजेचे आहे. जेएसडब्ल्यू कंपनी आणि अलिबाग शहराला पाणी देताना ७.१२ दलघमी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अलिबागला किती, कंपनीला किती याचा बोध होत नाही. कंपनीला एवढ्या मोठ्या संख्येने पाणी देण्याची गरज काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. जेएसडब्ल्यू हा मोठा प्रकल्प आहे. सरकारने उल्लेख केल्याप्रमाणे लघु- उद्योगांना पाणी देण्यात येणार आहे.त्यामुळे संशय बळावला आहे. जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या प्रकल्पांना पाणी आरक्षित ठेवण्यास विरोध असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले. वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.धरणाच्या पाण्यावर कोणाचा हक्क?सरकारने नागरिकांची तहान भागवण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी घेतलेला निर्णय अतिशय योग्य असाच आहे; परंतु उभारण्यात येणाऱ्या मातीच्या धरणातील पाण्यावर कोणाचा हक्क राहणार याबाबत मतप्रवाह सुरू झाले आहेत. नागरिकांच्या भल्यासाठी आणि शेतीसाठी उभारण्यात येणाºया धरणातील पाण्यावर अन्य कोणाचा अधिकार नसावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. धरणामध्ये किती पाणीसाठा होणार आहे. धरणातील किती टक्के पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी आरक्षित राहणार आहे. याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. जेएसडब्ल्यू कंपनी आणि अलिबाग शहरासाठी ७.१२ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये नमूद केले आहे.