शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

७/१२वरील सहीची तक्रार निकाली तलाठ्यांची आॅनलाइन सातबारावर डिजिटल सही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:18 IST

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये आता आॅनलाइन सातबारावर तलाठ्यांची डिजिटल सही मिळणार आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये आता आॅनलाइन सातबारावर तलाठ्यांची डिजिटल सही मिळणार आहे. त्यामुळे आता सातबारावर सही नसणे ही तक्र ार निकाली आहे.डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्र म हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सातबारा हा आॅनलाइन मिळावा यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्याला सातबारा मिळणार आहे. सातबारा आॅनलाइन असल्याने त्यामध्ये कोणतीच खाडाखोड अथवा बदल करता येणार नसल्याने खोट्या जमिनींच्या व्यवहारांना चाप लागला आहे. मूळ मालकाच्या संमतीशिवाय असे बदल करता येणार नसल्याने बोगस व्यवहारांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने सेझसारख्या प्रकल्पांचे वारे वाहू लागल्याने मोठ्या संख्येने खोटे व्यवहार झाले होते. या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी आॅनलाइन सातबारा हा चांगला पर्याय आहे. यासाठीच सरकारने १ मे २०१७ पासून जिल्ह्यातील सर्व गावातील जमिनींचे सातबारा आॅनलाइन करण्यावर मोठ्या संख्येने भर दिला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तब्बल एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्र म पार पडला आहे. ९८.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. चावडी वाचनाच्या वेळी कोणाला काही आक्षेप असतील, सातबारामध्ये काही दुरु स्त्या असतील त्या तेथेच करण्यात आल्या. आॅनलाइन सातबाराची प्रिंट प्राप्त झाल्यावर त्यावर लाल शाईने दुरु स्त्या, तर प्रशासनाच्या वतीने तलाठ्याने हिरव्या शाईने त्या दूर करण्याबाबतची प्रक्रि या पार पडली. त्यानंतर परिपूर्ण आॅनलाइन सातबारा आता एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.काही महिन्यांपूर्वी आॅनलाइन सातबारा शेतकºयांना मिळत होते, मात्र त्यावर तलाठ्याची सही घेण्यासाठी पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जावे लागायचे, तसेच तलाठ्यांची भेट होणे हेही कठीण होते. यासाठी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या तलाठ्यांची डिजिटल सही घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना तलाठ्यांच्या डिजिटल सहीने सातबारा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.तीन तालुक्यांत काम बाकी११५ तालुक्यांपैकी म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव या तालुक्यांमध्ये डिजिटल सहीचे सातबारा उपलब्ध होणार नाहीत. येथील काम लवकरच पूर्ण केल्यानंतर तेथेही डिजिटल सहीचे सातबारा मिळणार असल्याचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२१५ तालुक्यातील एक हजार ९७१ गावातील तब्बल एक लाख १४ हजार १७ सर्व्हेनंबरपैकी एक लाख ११ हजार ९०६९ सर्व्हेनंबर सातबारावर अंतिम करण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ९८.१६ टक्के आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांनी संवाद साधला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.३मुरु ड, पेण, पनवेल, तळा, सुधागड, पोलादपूर, श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये १०० टक्के ई-चावडी वाचनाचा कार्यक्र म पूर्ण झाला आहे. अद्यापही अलिबाग २, उरण ३, कर्जत ८, खालापूर ६, रोहे २, महाड ३ अशा एकूण २७ गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्र म होणे बाकी आहे.४आॅनलाइन सातबारा सहज उपलब्ध होत आहे. ही शेतकºयांसाठी चांगली बाब आहे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. बहुतांश शेतकºयांकडे संगणक नसल्याने त्यांना त्याची प्रिंट हवी असल्यास ती घेण्यासाठी आॅनलाइन सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा धंदा तेजीत राहणार आहे. आॅनलाइन सातबाराचे वेळोवेळी अपग्रेडेशन होणेही तितकेच गरजेचे आहे.५अपग्रेडेशन केल्यावर त्यांनी पुन्हा खात्री करु न घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खातेदाराने सजग राहणे गरजे आहे. खातेदाराने महिन्याच्या महिन्याला सर्व्हेनंबरच्या साताबारावर काही फेरफार झाली नाही ना याची माहिती घेणे गरजेचे आहे.