शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

७० शाळा बंद होणार !

By admin | Updated: May 8, 2016 02:52 IST

कर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील

- विजय मांडे,  कर्जतकर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील २८१ शाळांपैकी ७० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या २० इतकीही नाही, तर काही गावांतील शाळेचा पट शून्य आहे. या शाळांमधील शिक्षकांचे वेतन सुरूच असल्याने शासनाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद कराव्यात, असा शासनाचा विचार आहे. दिवसेंदिवस पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत आहे. हल्ली गावागावात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळामंधील पटसंख्येवर त्याचा परिणाम जाणवत आहे. कर्जत तालुक्यात २८१ शाळा आहेत. २१ केंद्रप्रमुख शिक्षक मंजूर असताना १७ शिक्षक कार्यरत आहेत. पदोन्नती मुख्याध्यापक ३१ मंजूर असताना ५० कार्यरत आहेत. ६४६ उपशिक्षक मंजूर असताना ७३१ कार्यरत आहेत. १८५ पदवीधर शिक्षक मंजूर असताना केवळ ५१ पदवीधर शिक्षकच कार्यरत आहेत. असे एकूण ८३२ शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त मुख्याध्यापक ३१ आहेत, तर अतिरिक्त उपशिक्षक ११० आहेत आणि एकही पदवीधर शिक्षक अतिरिक्त नाही. याउलट रिक्त मुख्याध्यापकांची संख्या १३ आहे. रिक्त उपशिक्षकांची संख्या २५ आहे आणि रिक्त पदवीधर शिक्षकांची संख्या १३४ आहे. ही आकडेवारी २०१५- १६ ची असल्याचे गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये यांनी सांगितली. नुकतेच मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन झाल्याचेही सांगितले. २८१ शाळांपैकी ७० शाळांमधील विद्यार्थी पट २० पेक्षा कमी आहे. गारपोली गावातील शाळेचा विद्यार्थी पट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या ७० शाळा कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे तेथील शिक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न सुद्धा समोर येईल.जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये चार किंवा पाच विद्यार्थी आहेत. शिक्षक दोन आहेत. त्यांच्या वेतनाचा विचार केल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च येतो ते दिसते. आणि इतका खर्च करावा की शाळा बंद कराव्यात, हे शासनाला ठरवावे लागेल. काही शिक्षक विद्यार्थी कमी असल्याने आपापसात तडजोड करतात, असेही निदर्शनास आले आहे. बदलीची शक्यतागारपोली गावातील शाळेचा विद्यार्थी पट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या ७० शाळा कधीही बंद होऊ शकतात. या ठिकाणी कार्यरत शिक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी नसल्याने शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आहे.शिक्षणाच्या अधिकारांतर्गत शासनाने १९ पट असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे या शिक्षकांचे काय करायचे, ते सरकारला ठरवावे लागेल. मुख्याध्यापकांचे समायोजन पूर्ण झाले आहे. पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उप शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रि या सुरू आहे.- सुरेश डंबाये, गट शिक्षण अधिकारी, कर्जत

शून्य विद्यार्थी पटाच्या शाळा बंद करायच्या की नाही ते सरकारने ठरवावे, मात्र एक विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करू नये. त्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. - मनोहर थोरवे, उप सभापती, कर्जत पंचायत समिती