शहरं
Join us  
Trending Stories
1
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
3
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
4
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
5
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
6
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
7
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
8
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
9
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
10
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
11
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
12
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
13
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
14
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
15
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
16
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
17
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
18
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारसाठी ७० कोटींचा निधी , रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये होणार कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:26 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.

अलिबाग : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या प्राथमिक आराखड्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यामध्ये लोकसहभागातून कर्जत तालुक्यातील सात गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील नऊ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशा एकूण ११३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या ११३ गावांमध्ये तब्बल दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभाग ३६ कोटी ७८ लाख, लघुसिंचन विभाग सहा कोटी ३० लाख, ग्रामीण पुरवठा विभाग १२ कोटी ९३ लाख, आणि वन विभागाकडील पाच कोटी २२ लाख रु पयांची कामे केली जाणार आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये ३८ गावे निवडण्यात आली आहेत. या गावात विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी शिल्लक कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना सर्व विभागांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या. यावेळी २०१७-१८साठी निवडलेल्या गावांबाबतही आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये लोकसहभागातील कर्जत तालुक्यातील ७ गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील ९ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशी एकूण ११३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या मृद व जल संधारणाच्या कामांच्या आराखड्यांना या सभेमध्ये तत्वत: मान्यता देण्यात आली. २०१७-१८ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रे डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये कामे सुरू करण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए.एस.शेळके, उपवनसंरक्षक मनीषकुमार, उपजिल्हाधिकारी रोहयो ए.ए.जैतू तसेच कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नवीन आराखडा तयारनव्याने आराखडा तयार केलेल्या ११३ गावातील दोन हजार ७०९ कामांचे व्यवस्थित नियोजन होण्यासाठी एका गावामध्ये फक्त ७० लाख रु पयेच खर्च करण्यावर भर देण्यात आला आहे.त्यापेक्षा अधिकची रक्कम लागणार असेल तर संबंधित समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तीन लाख रुपयांपासून ४५ लाख रुपयांपर्यंतची कामे जलयुक्त शिवार योजनेत करता येणार आहेत.२०१६-१७ या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा हा ३५ कोटी रु पयांचा होता.या वर्षी त्यामध्ये तब्बल दुप्पट वाढ करून ७० कोटी रु पयांवर नेला आहे.२०१६-१७ या कालावधीत ३८ गावांतील विविध कामांसाठी २६ कोटी रु पये प्राप्त होऊन नऊ कोटी बाकी होते.त्याही कामांना आता गती देऊन ती पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड