शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जलयुक्त शिवारसाठी ७० कोटींचा निधी , रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये होणार कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:26 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.

अलिबाग : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. यासाठी जिल्ह्याला ७० कोटी रु पयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आराखड्यात दुप्पट वाढ करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे बोलले जाते.जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या प्राथमिक आराखड्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यामध्ये लोकसहभागातून कर्जत तालुक्यातील सात गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील नऊ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशा एकूण ११३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या ११३ गावांमध्ये तब्बल दोन हजार ७०९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभाग ३६ कोटी ७८ लाख, लघुसिंचन विभाग सहा कोटी ३० लाख, ग्रामीण पुरवठा विभाग १२ कोटी ९३ लाख, आणि वन विभागाकडील पाच कोटी २२ लाख रु पयांची कामे केली जाणार आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये ३८ गावे निवडण्यात आली आहेत. या गावात विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी शिल्लक कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना सर्व विभागांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या. यावेळी २०१७-१८साठी निवडलेल्या गावांबाबतही आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये लोकसहभागातील कर्जत तालुक्यातील ७ गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील ९ गावे व तालुकास्तरीय समितीने निवडलेली ४१ तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ५६ अशी एकूण ११३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या मृद व जल संधारणाच्या कामांच्या आराखड्यांना या सभेमध्ये तत्वत: मान्यता देण्यात आली. २०१७-१८ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रे डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये कामे सुरू करण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए.एस.शेळके, उपवनसंरक्षक मनीषकुमार, उपजिल्हाधिकारी रोहयो ए.ए.जैतू तसेच कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नवीन आराखडा तयारनव्याने आराखडा तयार केलेल्या ११३ गावातील दोन हजार ७०९ कामांचे व्यवस्थित नियोजन होण्यासाठी एका गावामध्ये फक्त ७० लाख रु पयेच खर्च करण्यावर भर देण्यात आला आहे.त्यापेक्षा अधिकची रक्कम लागणार असेल तर संबंधित समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तीन लाख रुपयांपासून ४५ लाख रुपयांपर्यंतची कामे जलयुक्त शिवार योजनेत करता येणार आहेत.२०१६-१७ या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा हा ३५ कोटी रु पयांचा होता.या वर्षी त्यामध्ये तब्बल दुप्पट वाढ करून ७० कोटी रु पयांवर नेला आहे.२०१६-१७ या कालावधीत ३८ गावांतील विविध कामांसाठी २६ कोटी रु पये प्राप्त होऊन नऊ कोटी बाकी होते.त्याही कामांना आता गती देऊन ती पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड