शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

By निखिल म्हात्रे | Updated: February 11, 2024 19:14 IST

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन ...

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन सुरु आहे. फेज तीनमध्ये रायगड जिल्ह्यात दोन हजार ९७ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत तर ही योजना सुरु झाल्यापासून जिलह्यात आतापर्यंत एकूण ६७ हजार १५२ जणांना याचा लाभ मिळाला असून महिलांना धुरापासून मुक्ती मिळण्यास मदत झाली आहे.

ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील खऱ्या पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत असतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील खियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजना' कार्यान्वित करण्यात आली. 

केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजने'चा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देणे आहे आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस मोफत दिला जातो. यासोबतच नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर १६०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा टप्पाही सुरू केला आहे.  जिल्ह्यात उज्वला योजना २.० च्या फेज तीनमध्ये आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४ हजार ९७५, कर्जत ९ हजार ८२५, खालापूर ८ हजार २७३, महाड ५ हजार ९९६, माणगाव ३ हजार २३८, म्हसळा ४ हजार ४७४, पनवेल ३ हजार ९४२, पेण ९ हजार ७६५, पोलादपूर ७८७, रोहा ५ हजार ३९८, श्रीवर्धन ४ हजार ६२३, सुधागड १ हजार ६७१, तळा १ हजार ३३२, उरण १ हजार ७८९ असे एकूण ६७ हजार २४९ उज्ज्वला जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात बीपीसीएल कंपनीकडून ३० हजार ५६९, एचपीसी कंपनीकडून २८ हजार ७६७, आयओसी कंपनीकडून ७ हजार ९१३ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आरोग्याचे रक्षण - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागात भोजन बनविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरत येणाऱ्या इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळता आला असून, या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या केल्यामुळे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण सुद्धा साध्य करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड