शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

By निखिल म्हात्रे | Updated: February 11, 2024 19:14 IST

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन ...

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन सुरु आहे. फेज तीनमध्ये रायगड जिल्ह्यात दोन हजार ९७ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत तर ही योजना सुरु झाल्यापासून जिलह्यात आतापर्यंत एकूण ६७ हजार १५२ जणांना याचा लाभ मिळाला असून महिलांना धुरापासून मुक्ती मिळण्यास मदत झाली आहे.

ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील खऱ्या पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत असतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील खियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजना' कार्यान्वित करण्यात आली. 

केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजने'चा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देणे आहे आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस मोफत दिला जातो. यासोबतच नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर १६०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा टप्पाही सुरू केला आहे.  जिल्ह्यात उज्वला योजना २.० च्या फेज तीनमध्ये आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४ हजार ९७५, कर्जत ९ हजार ८२५, खालापूर ८ हजार २७३, महाड ५ हजार ९९६, माणगाव ३ हजार २३८, म्हसळा ४ हजार ४७४, पनवेल ३ हजार ९४२, पेण ९ हजार ७६५, पोलादपूर ७८७, रोहा ५ हजार ३९८, श्रीवर्धन ४ हजार ६२३, सुधागड १ हजार ६७१, तळा १ हजार ३३२, उरण १ हजार ७८९ असे एकूण ६७ हजार २४९ उज्ज्वला जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात बीपीसीएल कंपनीकडून ३० हजार ५६९, एचपीसी कंपनीकडून २८ हजार ७६७, आयओसी कंपनीकडून ७ हजार ९१३ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आरोग्याचे रक्षण - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागात भोजन बनविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरत येणाऱ्या इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळता आला असून, या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या केल्यामुळे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण सुद्धा साध्य करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड