शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

By निखिल म्हात्रे | Updated: February 11, 2024 19:14 IST

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन ...

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन सुरु आहे. फेज तीनमध्ये रायगड जिल्ह्यात दोन हजार ९७ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत तर ही योजना सुरु झाल्यापासून जिलह्यात आतापर्यंत एकूण ६७ हजार १५२ जणांना याचा लाभ मिळाला असून महिलांना धुरापासून मुक्ती मिळण्यास मदत झाली आहे.

ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील खऱ्या पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत असतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील खियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजना' कार्यान्वित करण्यात आली. 

केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजने'चा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देणे आहे आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस मोफत दिला जातो. यासोबतच नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर १६०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा टप्पाही सुरू केला आहे.  जिल्ह्यात उज्वला योजना २.० च्या फेज तीनमध्ये आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४ हजार ९७५, कर्जत ९ हजार ८२५, खालापूर ८ हजार २७३, महाड ५ हजार ९९६, माणगाव ३ हजार २३८, म्हसळा ४ हजार ४७४, पनवेल ३ हजार ९४२, पेण ९ हजार ७६५, पोलादपूर ७८७, रोहा ५ हजार ३९८, श्रीवर्धन ४ हजार ६२३, सुधागड १ हजार ६७१, तळा १ हजार ३३२, उरण १ हजार ७८९ असे एकूण ६७ हजार २४९ उज्ज्वला जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात बीपीसीएल कंपनीकडून ३० हजार ५६९, एचपीसी कंपनीकडून २८ हजार ७६७, आयओसी कंपनीकडून ७ हजार ९१३ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आरोग्याचे रक्षण - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागात भोजन बनविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरत येणाऱ्या इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळता आला असून, या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या केल्यामुळे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण सुद्धा साध्य करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड