शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

रस्त्याचे ६५ कोटी खड्ड्यात

By admin | Updated: July 24, 2015 03:24 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये

विजय मांडे , कर्जतमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र दोनच महिन्यांत मार्गाची दुर्दशा झाल्याने चौपदरीकरणासाठी खर्च करण्यात आलेले तब्बल ६५ कोटी खड्ड्यात गेल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. कल्याण-कर्जतपुढे खोपोली-हाळफाटा या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरणाला नोव्हेंबर २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. हे काम दोन वर्षांत होणे अपेक्षित असताना त्याला तब्बल दीड वर्षे उशीर झाला. मे २०१५ मध्ये एमएमआरडीएने रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी मार्गावरील साईडपट्टी, स्पीडब्रेकर आदी कामे अपूर्ण असल्याचे दिसत आहे. याशिवाय पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाली असून खड्ड्यांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या भरावामध्ये अवजड वाहने चिखलात फसत आहेत. कर्जत तालुक्यासह शेलू गावात आचार्य कॉलेजनंतर दामतकडे येताना रस्त्यावर साचणारे पाणी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दामत गावाच्या नाक्यावर रस्त्यावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुढे नेरळ, ममदापूर नाका येथे गतिरोधक दोन्ही बाजूला खड्ड्यांनी भरले आहेत. चिंचवलीच्या वळणावर आणि डिकसळ भागातील खड्ड्यांची खोली जवळपास एक फूट असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.