शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

रस्त्यासाठी ६०० कोटी

By admin | Updated: October 9, 2015 23:57 IST

अलिबाग-वडखळ या नव्याने विकसित होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी ६०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. त्यामुळे २२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ मिनिटांमध्ये

अलिबाग : अलिबाग-वडखळ या नव्याने विकसित होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी ६०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. त्यामुळे २२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शेकापचे विधान परिषदेचे सदस्य आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. विरार-अलिबाग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर अशा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक प्रगती झपाट्याने होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गापेक्षा उत्तम प्र्रतिचे रस्ते तयार केले जाणार आहे. काम सुरु केल्यानंतर दोन वर्षांमध्ये काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अलिबागपासून सुरु होणारा हा चार पदरी महामार्ग कार्लेखिंडीत आल्यावर तेथे दोन किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तेथून पुढे पेझारी चेकपोस्टमार्ग धरमतर पूल नव्याने उभारण्यात येणार आहे. तेथून पुढे शहाबाज नंतर थेट वडखळपर्यंत हा मार्ग जाऊन ही जागा वनखात्याची असल्याने त्याला परवानगी मिळणे कठीण असते. बोगद्यासाठी परवानगी मिळण्यास जास्त वेळ लागत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.सुरवसे यांनी सांगितले. २२ किलोमीटरचा हा महामार्ग पूर्णत: सिमेंट काँक्रीटचा राहणार असून शहाबाज ते आंबेघर हा ५.८ किलोमीटरचा बायपास मार्ग केल्यामुळे या विभागातील कमीत कमी विस्थापन होण्यास मदत मिळणार आहे, असेही सुरवसे यांनी स्पष्ट केले. 300 कोटी रुपये बोगद्यांसाठी खर्च केले जाणार असून ३०० कोटी रुपयांचे रस्ते केले जाणार आहेत. या मार्गावर उच्चप्रतिची स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. पार्किंगचीही व्यवस्था केली जाणार आहे. चार छोटे पूल आणि एक मोठा पूल उभारण्यात येणार आहे. नव्याने विकसित होणाऱ्या या मार्गावर गॅस पाइप लाइन, पाण्याची पाइप लाइन, विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. ताशी १००-१२० किलोमीटर प्रतिवेगाने वाहने धावू शकणार आहेत.